शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

प्रतिगाम्यांविरोधात राज्यात एकसंध राहा : शाहू छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशात २०१४ ला पुरोगामी विचाराचा वटवृक्ष ढासळला आणि प्रतिगामी शक्ती पुढे आली. बघता बघता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : देशात २०१४ ला पुरोगामी विचाराचा वटवृक्ष ढासळला आणि प्रतिगामी शक्ती पुढे आली. बघता बघता त्यांनी भारत ताब्यात घेतला. मात्र, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराने चालू इच्छिणाऱ्या मंडळी एकत्र आल्या आणि चांगल्या विचाराने पुढे जात आहेत. प्रतिगाम्यांविरोधात जिल्ह्यासह राज्यात असेच एकसंधपणे राहा, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी केले.

काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शाहू बोर्डिंग येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे संयोजक आमदार पी. एन. पाटील म्हणाले, गेली २८ वर्षे राजीव गांधी यांची जयंती साजरी करत आहोत. आजच्या परिस्थितीत राजीव गांधी यांचे विचारच देशाला वाचवू शकणार आहेत. केंद्रातील सरकारने देशाच्या मालकीच्या मालमत्ता विकण्याचा सपाटा लावला असून काही शिल्लक ठेवतील की नाही, याची भीती सामान्य माणसाच्या मनात आहे.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, देशात डिजिटल इंडियाची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. एकीकडे डिजिटल क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण विकासाला बळकटी देणारी पंचायत राज व्यवस्था सक्षमपणे राबवली. त्यांचे विचार घेऊनच आजच्या पिढीला पुढे जायचे आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजीव गांधी यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. मात्र, ‘बोफोर्स’मुळे काही आरोप झाले. न्यायालयीन चौकशीत ते निर्दोष सुटले तरीही त्यांच्या मानेवरून बोफोर्सचे भूत उतरले नाही. ‘राफेल’मध्ये किती घोटाळा झाला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याची चौकशीही होत नाही. मात्र, राफेलचे भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानेवरून उतरणार नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी आभार मानले. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व सद्भावना ज्योत प्रज्वलन शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. राहुल पाटील, मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिक्षण सभापती रसिका पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, व्ही. बी. पाटील, उदयसिंह पाटील-काैलवकर, मानसिंग बोंद्रे, प्रल्हाद चव्हाण, ॲड. सुरेश कुराडे, उदयानी साळुंखे, सुप्रिया साळोखे, संध्या घोटणे, बबन रानगे, एस. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.

अखंडितपणे जयंती साजरे करणारे ‘पी. एन.’ एकमेव

राजीव गांधी जयंती अखंडितपणे २८ वर्षे साजरी करणारे पी. एन. पाटील हे देशात एकमेव असल्याचे गौरवोद्गार शाहू छत्रपती, मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही

महापुरामुळे अंशत: पडझड झालेल्या घरांनाही पूर्ण भरपाई मिळणार असून पुनर्वसनासाठी ‘शबरी’, ‘रमाई’ योजनेतून आराखडा केला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीला सुरुवात करणार आहे, एकाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधकांनी राजकारण करू नये, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार देणारच

कोविडमुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. ११ हजार कोटींचे उत्पन्न आणि १४ हजार कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आघाडी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देणारच, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

मानाच्या दिंडीत मलाही सामील केले

दरवर्षी दिंडनेर्लीच्या माळावर पांडुरंगाच्या भक्तीसाठी कार्यकर्त्यांच्या दिंड्या येत असल्याचे बाळासाहेब खाडे यांनी सांगितले. हाच धागा पकडत यंदा मला मानाच्या दिंडीत सहभागी करून घेतल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी ‘पी. एन.’ यांचे आभार मानले.