शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सात पोलीस ठाण्यांत महिलाराज, कोल्हापूर परिक्षेत्रातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:04 IST

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : महिलांना समान हक्क मिळावेत, पोलीस ठाण्यांतील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला अधिकारी सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधील सात पोलीस ठाण्यांचे कारभार सात महिला पोलीस अधिकारी सांभाळत आहेत. या पोलीस ठाण्यांच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकाºयांच्या हाती सोपविली ...

ठळक मुद्देमहिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढवा : विश्वास नांगरे-पाटील यांचे आदेश

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : महिलांना समान हक्क मिळावेत, पोलीस ठाण्यांतील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला अधिकारी सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधील सात पोलीस ठाण्यांचे कारभार सात महिला पोलीस अधिकारी सांभाळत आहेत. या पोलीस ठाण्यांच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकाºयांच्या हाती सोपविली आहे. येत्या जून महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यात किमान चार पोलीस ठाण्यांचा कारभार महिला अधिकाºयांकडे सोपविण्याचे लेखी आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांमध्ये १४६ पोलीस ठाणी आहेत. आतापर्यंत सर्वच पोलीस ठाण्यांचा कारभार पुरुष अधिकाºयांकडे दिला जात होता. महिला पोलीस अधिकाºयांकडे कमी दर्जाच्या गुन्ह्यांचा तपास दिला जात असे. त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपविली जात नव्हती. त्यामुळे अनेक महिला अधिकाºयांना वरिष्ठ दर्जाची पदोन्नती मिळूनही दुय्यम दर्जाचा पदभार हाती सोपविला जात असे. यातून संबंधित महिला अधिकाºयांचे खच्चीकरण होत असे.पोलीस ठाण्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, ठकबाजी, फसवणूक, बलात्कार, गर्दी, मारामारी, बनावट नाणी, अपहरण, आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंग, जुगार, मटका, आदी गुन्हे दाखल होत असतात. महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपासच महिला अधिकाºयांकडे दिला जात असे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी म्हणून त्यांना स्थान दिले जात नसे. एखाद्या महिला अधिकाºयाची धाडसी गुन्ह्यामध्ये काम करण्याची तयारी असली तरीही त्यांना महिला असल्याने जबाबदारी दिली जात नाही. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरुष व महिला पोलिसांमध्ये समन्वय राहावा, कामाची जबाबदारी समजावी, तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षमपणे चालावे यासाठी राज्यातील काही ठाण्यांच्या कारभाराची जबाबदारी महिला अधिकाºयांवर सोपविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबईत सुमारे ८ धाडसी महिला अधिकाºयांकडे पोलीस ठाण्यांचा पदभार दिला. यासंबंधी कोल्हापूर परिक्षेत्रातील माहिती घेतली असता कोल्हापूर परिक्षेत्रात सात महिला अधिकाºयांकडे सात पोलीस ठाण्यांचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सोपविला आहे. या सातही पोलीस ठाण्यांचे कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे चालले असून, हद्दीमध्ये अवैध धंदे पूर्णत: बंद असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. गृहखात्याच्या या निर्णयामुळे पुरुषांबरोबर महिला पोलिसांनाही एक पाऊल पुढे टाकण्याची संधी प्राप्त झाली आहे.बहुतांश महिला पोलीस अधिकारी कामकाजाची माहिती नसल्याने अनभिज्ञ आहेत. महिलांनीही सक्षमपणे पुढे येऊन पोलीस ठाण्याचे कामकाज चालवावे, हा उद्देश समोर ठेवून पोलीस ठाण्यांचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सोपविली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान चार पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणून महिला अधिकाºयांची नियुक्ती करावी, असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.-विश्वास नांगरे-पाटील,विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्रया चालवितात कारभारकोल्हापूर : रजिया नदाफ, सहायक पोलीस निरीक्षक, नेसरी पोलीस ठाणे.सांगली : सरोजिनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, पलूस पोलीस ठाणे. जयश्री पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कुंडल पोलीस ठाणेसातारा : वैशाली पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, तळबीड पोलीस ठाणे. तृप्ती सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक, पाचगणी पोलीस ठाणे.सोलापूर ग्रामीण : विजयालक्ष्मी कुर्री : पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा.पुणे ग्रामीण : साधना पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे, एमआयडीसी पोलीस ठाणे.