शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पीककर्ज न देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँंकांची खाती बंद जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:03 IST

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करीत येथील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्ह्णातील ६० हजार ५७३ शेतकºयांना ६३९ कोटी ७१ लाखांचे पीक कर्ज वितरण केले आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेचे काम ८० ...

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करीत येथील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्ह्णातील ६० हजार ५७३ शेतकºयांना ६३९ कोटी ७१ लाखांचे पीक कर्ज वितरण केले आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेचे काम ८० टक्के, तर राष्टÑीयीकृत बॅँकांचे केवळ आठ टक्के कर्ज वाटप असून ही बाब गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक मोहन सागवेकर, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

खरीप हंगामातील पीककर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँकांचे काम समाधानकारक नसून, त्यामध्ये तत्काळ सुधारणा करणे गरजेचे आहे. पीककर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या कामी हयगय आणि टाळाटाळ करणाºया बँकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाºयांनी दिला. तसेच बँकांनी येत्या आठवडाभरात या कामी सुधारणा करून अधिकाधिक शेतकºयांना पीक कर्जवाटपाचे वितरण करावे, असे निर्देशही दिले.

ते पुढे म्हणाले, पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांसाठी ४४९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३८ कोटींचे पीककर्ज वितरण केले आहे, ही बाब चिंताजनक आणि गंभीर आहे. तसेच पीककर्ज वितरणात खासगी बँकांचे काम १२ टक्के आणि ग्रामीण बँकांचे काम पाच टक्के झाले आहे.जिल्ह्णात आर्थिक साक्षरता केंद्रामार्फत गावागावात बँकिंग साक्षरतेबाबत प्रबोधन मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक माने यांनी सांगितले.यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाºयांसह विविध बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप कराजिल्ह्यासाठी १३८९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६३९ कोटी ७१ लाख पीक कर्ज वाटप केले आहे. उर्वरित पीक कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत तसेच सर्वच बँकांनी युद्धपातळीवर हाती घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिले. कोणत्याही पात्र शेतकºयाला पीककर्ज नाकारणे गैर असून, या कामी बँकांनी सदैव सकारात्मक भूमिका घेऊन शेतकºयांचे हित जोपासावे, असेही त्यांनी सांगितले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित जिल्हा अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सुषमा देसाई, राहुल माने, आमदार प्रकाश आबिटकर, डॉ. कुणाल खेमनार, आमदार अमल महाडिक, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीbankबँक