शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पीककर्ज न देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँंकांची खाती बंद जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:03 IST

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करीत येथील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्ह्णातील ६० हजार ५७३ शेतकºयांना ६३९ कोटी ७१ लाखांचे पीक कर्ज वितरण केले आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेचे काम ८० ...

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करीत येथील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्ह्णातील ६० हजार ५७३ शेतकºयांना ६३९ कोटी ७१ लाखांचे पीक कर्ज वितरण केले आहे. यामध्ये जिल्हा बॅँकेचे काम ८० टक्के, तर राष्टÑीयीकृत बॅँकांचे केवळ आठ टक्के कर्ज वाटप असून ही बाब गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक मोहन सागवेकर, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

खरीप हंगामातील पीककर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँकांचे काम समाधानकारक नसून, त्यामध्ये तत्काळ सुधारणा करणे गरजेचे आहे. पीककर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या कामी हयगय आणि टाळाटाळ करणाºया बँकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाºयांनी दिला. तसेच बँकांनी येत्या आठवडाभरात या कामी सुधारणा करून अधिकाधिक शेतकºयांना पीक कर्जवाटपाचे वितरण करावे, असे निर्देशही दिले.

ते पुढे म्हणाले, पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांसाठी ४४९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ ३८ कोटींचे पीककर्ज वितरण केले आहे, ही बाब चिंताजनक आणि गंभीर आहे. तसेच पीककर्ज वितरणात खासगी बँकांचे काम १२ टक्के आणि ग्रामीण बँकांचे काम पाच टक्के झाले आहे.जिल्ह्णात आर्थिक साक्षरता केंद्रामार्फत गावागावात बँकिंग साक्षरतेबाबत प्रबोधन मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक माने यांनी सांगितले.यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाºयांसह विविध बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप कराजिल्ह्यासाठी १३८९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६३९ कोटी ७१ लाख पीक कर्ज वाटप केले आहे. उर्वरित पीक कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत तसेच सर्वच बँकांनी युद्धपातळीवर हाती घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिले. कोणत्याही पात्र शेतकºयाला पीककर्ज नाकारणे गैर असून, या कामी बँकांनी सदैव सकारात्मक भूमिका घेऊन शेतकºयांचे हित जोपासावे, असेही त्यांनी सांगितले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित जिल्हा अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सुषमा देसाई, राहुल माने, आमदार प्रकाश आबिटकर, डॉ. कुणाल खेमनार, आमदार अमल महाडिक, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीbankबँक