शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शेती कायदा दुरुस्तीसाठी किसान सभेचे राज्यभर जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

कोल्हापूर : केंद्राच्या कृषी विधेयकात राज्य सरकारने तातडीने दुरुस्ती करावी, ही मागणी असतानाही चालढकल होत असल्याने आता ...

कोल्हापूर : केंद्राच्या कृषी विधेयकात राज्य सरकारने तातडीने दुरुस्ती करावी, ही मागणी असतानाही चालढकल होत असल्याने आता महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्यभर जनजागरण मोहीम राबवण्याचे नियोजन करत असल्याचे नामदेव गावडे यांनी सांगितले. दुरुस्तीविना कायद्याची अंमलबजावणी ही शेतकऱ्यांनी फसवणूक ठरेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे अन्यायी व एकतर्फी असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांना वाढता विरोध होत असल्याने केेंद्र सरकारने राज्य सरकारला दुरुस्तीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारनेही दुरुस्तीसाठी तयारी दर्शवत ते विधेयक स्वरूपात विधिमंडळाच्या पटलावर मांडण्याचा शब्ददेखील मुख्यमंत्र्यांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले होती. त्यानुसार कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे विधेयक पटलावर ठेवले.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेता किसान सभेने लोकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच राज्य सरकारवर दुरुस्तीसाठी दबाव टाकण्यासाठी म्हणून जनजागरण मोहीम सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान राज्य सरकारना दुरुस्तीचे अधिकार केंद्र सरकारने दिले असलेतरी सर्वोच्च न्यायालयाने त्याला घटनाबाह्य ठरवले आहे. संसदेने केलेल्या कायद्यात संसदेलाच बदल करता येतात, ते राज्य विधिमंडळ करू शकत नाही, असा घटनात्मक पेचही किसान सभेने सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. तरीदेखील राज्य सरकारने दुरुस्ती विधेयक मांडते, याचा अर्थ त्यांना फसवणूकच करायची आहे, असेही गावडे यांनी म्हटले आहे.