शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शेती कायदा दुरुस्तीसाठी किसान सभेचे राज्यभर जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

कोल्हापूर : केंद्राच्या कृषी विधेयकात राज्य सरकारने तातडीने दुरुस्ती करावी, ही मागणी असतानाही चालढकल होत असल्याने आता ...

कोल्हापूर : केंद्राच्या कृषी विधेयकात राज्य सरकारने तातडीने दुरुस्ती करावी, ही मागणी असतानाही चालढकल होत असल्याने आता महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्यभर जनजागरण मोहीम राबवण्याचे नियोजन करत असल्याचे नामदेव गावडे यांनी सांगितले. दुरुस्तीविना कायद्याची अंमलबजावणी ही शेतकऱ्यांनी फसवणूक ठरेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे अन्यायी व एकतर्फी असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांना वाढता विरोध होत असल्याने केेंद्र सरकारने राज्य सरकारला दुरुस्तीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारनेही दुरुस्तीसाठी तयारी दर्शवत ते विधेयक स्वरूपात विधिमंडळाच्या पटलावर मांडण्याचा शब्ददेखील मुख्यमंत्र्यांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले होती. त्यानुसार कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे विधेयक पटलावर ठेवले.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेता किसान सभेने लोकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच राज्य सरकारवर दुरुस्तीसाठी दबाव टाकण्यासाठी म्हणून जनजागरण मोहीम सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान राज्य सरकारना दुरुस्तीचे अधिकार केंद्र सरकारने दिले असलेतरी सर्वोच्च न्यायालयाने त्याला घटनाबाह्य ठरवले आहे. संसदेने केलेल्या कायद्यात संसदेलाच बदल करता येतात, ते राज्य विधिमंडळ करू शकत नाही, असा घटनात्मक पेचही किसान सभेने सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. तरीदेखील राज्य सरकारने दुरुस्ती विधेयक मांडते, याचा अर्थ त्यांना फसवणूकच करायची आहे, असेही गावडे यांनी म्हटले आहे.