शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेती कायदा दुरुस्तीसाठी किसान सभेचे राज्यभर जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

कोल्हापूर : केंद्राच्या कृषी विधेयकात राज्य सरकारने तातडीने दुरुस्ती करावी, ही मागणी असतानाही चालढकल होत असल्याने आता ...

कोल्हापूर : केंद्राच्या कृषी विधेयकात राज्य सरकारने तातडीने दुरुस्ती करावी, ही मागणी असतानाही चालढकल होत असल्याने आता महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्यभर जनजागरण मोहीम राबवण्याचे नियोजन करत असल्याचे नामदेव गावडे यांनी सांगितले. दुरुस्तीविना कायद्याची अंमलबजावणी ही शेतकऱ्यांनी फसवणूक ठरेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे अन्यायी व एकतर्फी असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांना वाढता विरोध होत असल्याने केेंद्र सरकारने राज्य सरकारला दुरुस्तीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारनेही दुरुस्तीसाठी तयारी दर्शवत ते विधेयक स्वरूपात विधिमंडळाच्या पटलावर मांडण्याचा शब्ददेखील मुख्यमंत्र्यांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले होती. त्यानुसार कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे विधेयक पटलावर ठेवले.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेता किसान सभेने लोकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच राज्य सरकारवर दुरुस्तीसाठी दबाव टाकण्यासाठी म्हणून जनजागरण मोहीम सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान राज्य सरकारना दुरुस्तीचे अधिकार केंद्र सरकारने दिले असलेतरी सर्वोच्च न्यायालयाने त्याला घटनाबाह्य ठरवले आहे. संसदेने केलेल्या कायद्यात संसदेलाच बदल करता येतात, ते राज्य विधिमंडळ करू शकत नाही, असा घटनात्मक पेचही किसान सभेने सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. तरीदेखील राज्य सरकारने दुरुस्ती विधेयक मांडते, याचा अर्थ त्यांना फसवणूकच करायची आहे, असेही गावडे यांनी म्हटले आहे.