शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘महादेवी’साठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे अनुमती, पुढच्या तारखेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:47 IST

मुख्यमंत्र्यांच्या वकिलांचे म्हणणे घेतले ऐकून

कोल्हापूर : महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या वकिलांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुढचे पाऊल टाकले आहे. ही हत्तीण नांदणी मठाकडे परत पाठवण्यासाठी उच्चाधिकार समितीकडे अनुमती मागण्याची मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी विनंती केली आहे.हे प्रकरण सुचीबद्ध झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या हत्तीणीसंदर्भातील सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारच्या वकिलांनी बदललेली परिस्थिती, घटनाक्रम आणि नवी भूमिका मांडली. ती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऐकून घेतली. यासंदर्भात पुढील सुनावणी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महादेवी हत्तीणीला नांदणीत परत आणण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वकिलांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयाकडे वन्यप्राण्यांसाठी असलेल्या उच्चाधिकार समितीकडे अनुमती देण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यावर हे प्रकरण सुचीबद्ध करण्यासाठी न्यायालयाने सहमती दर्शवली होती.याप्रकरणी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारचे वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सर्वाेच्च न्यायालयाचा आदर करत नांदणी मठाने ‘महादेवी हत्तीणी’ला २८ जुलै रोजी जामनगर येथील 'वनतारा'च्या राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवल्याचे स्पष्ट करून त्यानंतर बदललेल्या भूमिकेचा आणि त्यासंदर्भातील घडलेले घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.नांदणी मठाच्या मागणीला राज्य सरकार आणि वनतारा यांचा आक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात उच्चाधिकार समितीकडे हत्तीण परत नांदणी मठात पाठवण्यासाठी अनुमती द्यावी, अशी भूमिका मांडली. यासंदर्भात न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती नांदणी मठाचे वकील ॲड. मनोज पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ॲड. सिद्धार्थ धर्माधिकारी, नांदणी मठाकडून ॲड. मनोज पाटील, ॲड. सुंधांशू चौधरी, ॲड. आनंद लांडगे वनताराकडून ॲड. शार्दूल सिंग आणि ॲड. बलबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.

‘माधुरी’ला वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.