शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘महादेवी’साठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे अनुमती, पुढच्या तारखेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:47 IST

मुख्यमंत्र्यांच्या वकिलांचे म्हणणे घेतले ऐकून

कोल्हापूर : महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या वकिलांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुढचे पाऊल टाकले आहे. ही हत्तीण नांदणी मठाकडे परत पाठवण्यासाठी उच्चाधिकार समितीकडे अनुमती मागण्याची मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी विनंती केली आहे.हे प्रकरण सुचीबद्ध झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या हत्तीणीसंदर्भातील सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारच्या वकिलांनी बदललेली परिस्थिती, घटनाक्रम आणि नवी भूमिका मांडली. ती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऐकून घेतली. यासंदर्भात पुढील सुनावणी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महादेवी हत्तीणीला नांदणीत परत आणण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वकिलांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयाकडे वन्यप्राण्यांसाठी असलेल्या उच्चाधिकार समितीकडे अनुमती देण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यावर हे प्रकरण सुचीबद्ध करण्यासाठी न्यायालयाने सहमती दर्शवली होती.याप्रकरणी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारचे वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सर्वाेच्च न्यायालयाचा आदर करत नांदणी मठाने ‘महादेवी हत्तीणी’ला २८ जुलै रोजी जामनगर येथील 'वनतारा'च्या राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवल्याचे स्पष्ट करून त्यानंतर बदललेल्या भूमिकेचा आणि त्यासंदर्भातील घडलेले घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.नांदणी मठाच्या मागणीला राज्य सरकार आणि वनतारा यांचा आक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात उच्चाधिकार समितीकडे हत्तीण परत नांदणी मठात पाठवण्यासाठी अनुमती द्यावी, अशी भूमिका मांडली. यासंदर्भात न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती नांदणी मठाचे वकील ॲड. मनोज पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ॲड. सिद्धार्थ धर्माधिकारी, नांदणी मठाकडून ॲड. मनोज पाटील, ॲड. सुंधांशू चौधरी, ॲड. आनंद लांडगे वनताराकडून ॲड. शार्दूल सिंग आणि ॲड. बलबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.

‘माधुरी’ला वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.