शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

Kolhapur: ‘महादेवी’साठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे अनुमती, पुढच्या तारखेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:47 IST

मुख्यमंत्र्यांच्या वकिलांचे म्हणणे घेतले ऐकून

कोल्हापूर : महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या वकिलांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुढचे पाऊल टाकले आहे. ही हत्तीण नांदणी मठाकडे परत पाठवण्यासाठी उच्चाधिकार समितीकडे अनुमती मागण्याची मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी विनंती केली आहे.हे प्रकरण सुचीबद्ध झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर या हत्तीणीसंदर्भातील सुनावणी झाली. त्यात राज्य सरकारच्या वकिलांनी बदललेली परिस्थिती, घटनाक्रम आणि नवी भूमिका मांडली. ती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऐकून घेतली. यासंदर्भात पुढील सुनावणी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महादेवी हत्तीणीला नांदणीत परत आणण्यासाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या वकिलांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयाकडे वन्यप्राण्यांसाठी असलेल्या उच्चाधिकार समितीकडे अनुमती देण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यावर हे प्रकरण सुचीबद्ध करण्यासाठी न्यायालयाने सहमती दर्शवली होती.याप्रकरणी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारचे वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सर्वाेच्च न्यायालयाचा आदर करत नांदणी मठाने ‘महादेवी हत्तीणी’ला २८ जुलै रोजी जामनगर येथील 'वनतारा'च्या राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवल्याचे स्पष्ट करून त्यानंतर बदललेल्या भूमिकेचा आणि त्यासंदर्भातील घडलेले घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.नांदणी मठाच्या मागणीला राज्य सरकार आणि वनतारा यांचा आक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात उच्चाधिकार समितीकडे हत्तीण परत नांदणी मठात पाठवण्यासाठी अनुमती द्यावी, अशी भूमिका मांडली. यासंदर्भात न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती नांदणी मठाचे वकील ॲड. मनोज पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ॲड. सिद्धार्थ धर्माधिकारी, नांदणी मठाकडून ॲड. मनोज पाटील, ॲड. सुंधांशू चौधरी, ॲड. आनंद लांडगे वनताराकडून ॲड. शार्दूल सिंग आणि ॲड. बलबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.

‘माधुरी’ला वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.