शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 12:22 IST

परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत.

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहार समोर आल्याने दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांची टीईटी परीक्षेच्या मूळ प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार टीईटी प्रमाणपत्र संकलित करण्याचे आदेश या परिषदेने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. या विभागांनी २०९ शिक्षकांची प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेला सादर केली आहेत.प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात ११६, तर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये ९६ शिक्षक हे दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षक हे केंद्रीय टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ११३ आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या टीईटीची मूळ प्रमाणपत्रे शुक्रवारी सादर केली आहेत. परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत.

कशामुळे होतेय पडताळणी

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी गैरव्यवहार करून गुण वाढविल्याचे प्रकरण अलीकडेच उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही पडताळणी केली जात आहे. अशा प्रकारे पात्र ठरवून कोणी शिक्षक नोकरीला लागले का? याचा शोध परीक्षा परिषदेकडून घेतला जात आहे. त्यासाठी आयुक्तांनी कागदपत्रे पडताळणीच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

तर, वेतन मिळणार नाही

- परीक्षा परिषदेला परिषदेकडे शिक्षकांनी टीईटीचे मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविणे बंधनकारक आहे. जे प्रमाणपत्र पाठविणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे.- या प्रमाणपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात येणार आहे. यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास ती माहिती परीक्षा परिषद शासनाला देईल. त्यानंतर संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाईल.- जे शिक्षक मूळ प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन देण्यात येणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे.

जिल्ह्यातील शिक्षक

पहिली ते पाचवीपर्यंत एकूण शिक्षक : ७९६७

१३ फेब्रुवारीनंतर नियुक्त शिक्षक : ११३

सहावी ते आठवीपर्यंत एकूण शिक्षक : ६८४०

१३ फेब्रुवारीनंतर नियुक्त शिक्षक : ९६

जिल्ह्यातील ९६ माध्यमिक शिक्षकांची टीईटीची मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेला सादर केली आहेत. पडताळणीची कार्यवाही या परिषदेकडून होईल. -एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक