शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ,प्रविण घुगे अध्यक्ष

By admin | Updated: May 30, 2017 16:21 IST

सात वर्षानंतर अस्तित्व : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर जाग

विश्र्वास पाटील/आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : राज्यभरातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी असलेला बाल हक्क संरक्षण आयोग शासनाने स्थापन केला आहे. महिला व बालविकास विभागाने त्यासंबंधीची अधिसूचना २० मे रोजीच्या राजपत्रात प्रसिध्द केली आहे. औरंगाबादमधील प्रविण घुगे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून एकूण सहा सदस्य आहेत. आयोगाचा कालावधी तीन वर्षाचा आहे.

नूतन अध्यक्ष घुगे हे मुळचे उस्मानाबदचे असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री तसेच प्रदेश संघटन मंत्री होते. सध्या भाजपचे ते विभाग संघटन मंत्री म्हणून काम करत होते. केंद्रिय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ च्या कलम १७ अन्वये प्रत्येक राज्यांने राज्य आयोग स्थापन करावा असे कायदेशीर बंधन होते. त्यानुसार महाराष्ट्राने या आयोगाची (महिला व बालविकास विभाग, क्रमांक बाहआ-२००६/सीआर१३८/का-३ दि २४ जुलै २००७) स्थापना केली. त्यावेळी असा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य होते. परंतू या आयोगाची मुदत २०१० ला संपली.

पुढे लगेच डिसेंबर २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने जाहिरात प्रसिध्द करून नांवे मागवली. त्यांच्या सप्टेंबर २०१२ मध्ये मुलाखतीही झाल्या. परंतू कुणाचे सदस्य किती घ्यायचे यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये सवयीप्रमाणे वाद झाल्याने हा आयोगच गठित झाला नाही. पुढे राज्यात सत्तांतर होवून भाजप सरकार सत्तेत आले. परंतू त्यांनाही सुरुवातीची अडीच वर्षे या आयोगाकडे लक्ष दिले नाही. परवाच्या ४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात एक रिटपिटीशन दाखल झाले. त्यामध्ये न्यायालयाने देशभरांतील बाल हक्क संरक्षण आयोगांचा आढावा घेतला, त्यात महाराष्ट्रासह, गोवा, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, आंंध्रप्रदेश, बिहार, चंदीगड अशा देशातील १४ राज्यांत या आयोगाची स्थापनाच झाली नसल्याचे निदर्शनास आल्यावर न्यायालयाने फटकारले व चार आठवड्यांच्या आत आयोगाची नियुक्ती करावी असे आदेश दिले.

कांही ठिकाणी अध्यक्ष आहेत, तर सदस्य नाहीत. सदस्य आहेत तर अध्यक्षांची मुदत संपली आहे अशी स्थिती बहुतांशी ठिकाणी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा धसका घेवून महाराष्ट्र शासनानेही तातडीने या आयोगाची स्थापना केली. या खटल्यातील पुढील सुनावणी ११ जुलै २०१७ ला आहे.

असा आहे आयोग

अध्यक्ष -प्रविण शिवाजीराव घुगे (औरंगाबाद ) सदस्य सर्वश्री : संतोष विश्र्वनाथ शिंदे (मुंबई), श्रीमती श्रीबाला विश्वासराव देशपांडे (नागपूर), डॉ.शालिनी बाळासाहेब कराड (परळी वैजनाथ), प्रा.आसमा शेख-पटेल (पुणे), विजय जाधव (दादर मुंबई) आणि अ‍ॅड स्वरदा श्रीरंग केळकर (सांगली).

राज्यमंत्र्याचा दर्जा

हा निम्न न्यायिक अधिकार असलेला आयोग आहे. राज्य महिला आयोगाप्रमाणेच आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. मुंबई व औरंगाबाद खंडपीमार्फत या आयोगाचे काम चालते.

कार्यकक्षा

बाल न्याय अधिनियम २०१५ च्या कलम १०९ नुसार कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे काम हा आयोग करतो. बालकांचे कायदे, त्यांचे हक्क यासंबंधीची जागृती व त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होईल यासाठी आयोगामार्फत प्रयत्त्न केले जातात.

 या आयोगाची स्थापना व्हावी यासाठी आम्ही २०११ पासून पाठपुरावा करत होतो. बाल हक्क चळवळीत काम करणाऱ्या संस्थाच्या दृष्टीने या आयोगाचे महत्व आहे. भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयाने बडगा उगारल्यावर का असेना त्याची तातडीने नियुक्ती केली हे चांगले झाले.

अतुल देसाई

आभास फाऊंडेशन कोल्हापूर