शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-औदुंबर जलवाहतूक सुरू करा

By admin | Updated: May 29, 2015 00:03 IST

संजयकाका पाटील : गडकरी यांच्याकडे मागणी करणार

सांगली : सांगली ते कसबे डिग्रज व तेथून औदुंबरपर्यंत कृष्णा नदीतून जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती खा. संजयकाका पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. गडकरी शुक्रवार, दि. २९ रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध समस्याही त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, सांगली, कसबे डिग्रज व औदुंबर येथे कृष्णा नदीत बंधारे आहेत. कृष्णाकाठच्या लोकांना बंधाऱ्यावरून नदी पार करावी लागते. पावसाळ्यात नदीला पाणी वाढले की पलीकडे जाता येत नाही. यामुळे जलवाहतूक सुरूकेल्यास लोकांचे प्रश्न मिटतील. तसेच विकासाच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सांगलीतील बंधाऱ्यापासून कसबे डिग्रज व तेथील बंधाऱ्यापासून औदुंबरच्या बंधाऱ्यापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी शुक्रवारी गडकरी यांच्याकडे करणार आहोत. केवळ मागणी करून थांबणार नाही, तर त्याचा भविष्यात पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले जाईल. ते म्हणाले, सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गतीने व राष्ट्रीय महामार्गाच्या निकषाने व्हावे, यासाठी या कामाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, अशी मागणीही गडकरी यांच्याकडे केली जाणार आहे. चौपदरीकरणामुळे अपघातांना आळा बसणार आहे. यासाठी त्याचे काम चांगले व्हावे, अशी सांगली, कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. हे काम गतीने व्हावे, यासाठीही चर्चा करणार आहे. गुहागर-विजापूर या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, तसेच धुळे, अहमदनगर, बारामती, विटा, तासगाव, काकडवाडी, मिरज, म्हैसाळ ते बेळगाव या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला जावा, अशीही मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)