शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

आंतरविद्यापीठीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

By admin | Updated: December 7, 2015 00:17 IST

या स्पर्धेत देशाच्या पाच राज्यांतील ४० विद्यापीठांतील ४८० विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक सहभागी

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविद्यापीठीय पश्चिम विभागीय महिला कबड्डी स्पर्धेला महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर रविवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशाच्या पाच राज्यांतील ४० विद्यापीठांतील ४८० विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.यावेळी उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठाचे बी. सी. यु. डी. संचालक डॉ. अनिल पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उत्तम केंद्रे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, सहकार्यवाह नाना पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विद्यार्थी प्रतिनिधी केवल मलुष्टे उपस्थित होते.खेळाडूंना मार्गदर्शन करताना डॉ. अनिल पाटील म्हणाले की, हे महाविद्यालय विद्यापीठातील सक्षम महाविद्यालय असून, उच्च गुणवत्ता धारण करणारे असल्यानेच त्यांना स्पर्धा आयोजनाची जबाबदारी देण्यात आली. पाच राज्यांतून आलेल्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आणि संयोजन समितीचे सचिव डॉ. विनोद शिंंदे यांनी स्वागत केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांच्या हस्ते डॉ. अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नाना पाटील यांनी डॉ. उत्तम केंद्रे यांचा सत्कार केला. विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. टिळक, सावरकर, आंबेडकर यांच्या जन्मभूमीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे अ‍ॅड. विलास पाटणे यांनी स्वागत केले. ही भूमी पर्यटनस्थळ असून, इथला अथांग सागर इथल्या मानवी मनाची प्रचिती देतो, अशा प्रदेशात स्पर्धकांनी स्पर्धांचा आनंद लुटावा, स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उत्तम केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. या समारंभाकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. बी. एस्. बिडवे, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे, भूतपूर्व क्रीडा संचालक मदन भास्करे, विज्ञान विभागाचे अरविंद कुलकर्णी उपस्थित होते. उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)४० विद्यापीठातील ४८० विद्यार्थी व प्रशिक्षक सहभागी.मुंबई विद्यापीठ आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजन.स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटावा : विलास पाटणे.विविध मान्यवरांचा उद्घाटनप्रसंगी करण्यात आला सत्कार.