शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

रौप्यनगरीत कचरा उठावासाठी घंटागाडीचा प्रारंभ

By admin | Updated: October 19, 2015 23:56 IST

माजी सरपंचांचा उपक्रम : योजनेसाठी स्वत:च्या नावावर घेतले तीन लाखांचे कर्ज

हुपरी : संपूर्ण देशामध्ये ‘रौप्यनगरी’ असा नावलौकिक प्राप्त केलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) शहराची स्वच्छता आता केवळ रामभरोसेच होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचले जाऊन परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले जात आहे. रौप्यनगरी असा नावलौकिक प्राप्त झालेल्या शहराला असे वातावरण शोभणारे नाही, याची जाणीव झालेल्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दौलतराव पाटील यांनी स्वत:च्या नावे तीन लाख रुपयांचे बँक कर्ज घेऊन ‘स्वच्छ हुपरी, सुंदर हुपरी’चे स्वप्न साकारण्यासाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जनतेच्या सेवेसाठी कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी सेवेचा प्रारंभ केला. सुमारे ५५ हजार लोकसंख्या असणाऱ्या व वार्षिक तीन कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे सौजन्य दाखविता आले नाही. मात्र, स्वत:च्या नावे कर्जावू लाखो रुपये घेऊन शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे शिवधनुष्य उचलणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक रौप्यनगरीवासीय तोंडभरून करीत आहेत. दौलतराव पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये अतिशय धाडसी निर्णय घेत शहरामध्ये अनेक प्रकारची विकासकामे राबविली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते राज्यातील पहिले सरपंच म्हणून परिचित आहेत. संपूर्ण देशामध्ये रौप्यनगरी म्हणून ओळख असणाऱ्या हुपरी शहरामध्ये जागोजागी, मुख्य रस्त्यावरती, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पाहावयास मिळते. परिणामी, परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने रौप्यनगरीवासीयांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हा संताप ग्रामपंचायत प्रशासनाला ऐकूच जात नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.उद्योगपती बाबूराव जाधव, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव पाटील यांच्या हस्ते कचरा-घंटागीडीचे पूजन करून ग्रामसेवेला प्रारंभ करण्यात आला. या अभिनव उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, शहरातील कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी सेवा लोकार्पण करताना आपणही ‘स्वच्छ भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असल्याचा अत्यानंद होत आहे. भविष्यातही जनतेसाठी बहुपयोगी सेवा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. या समारंभावेळी सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार, अजित सुतार, आनंदी माळी, विठ्ठल पाटील, आनंदा कांबळे, सिंधुताई खाडे, रुक्मिणी मुधाळे, धर्मवीर कांबळे, मनसे शहराध्यक्ष गणेश मालवेकर, मोहन वार्इंगडे, नीळकंठ गायकवाड, आण्णासो पाटील, सुरेश इंग्रोळे, आदी उपस्थित होते.‘स्वच्छ हुपरी’चे स्वप्न साकारण्यासाठी माजी सरपंच व विद्यमान सदस्य दौलतराव पाटील यांनी शहरातील एका बँकेतून तीन लाख रुपये कर्ज स्वत:च्या नावे घेतले. याच रकमेतून शहरातील घराघरांतील दैनंदिन कचरा उचलण्यासाठी घंटागाडी खरेदी केली. घटस्थापनेला ही घंटागाडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित करून ‘स्वच्छ हुपरी, सुंदर हुपरी’च्या अभिनव उपक्रमास सुरुवात केली. या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक