शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बालिंगा पूल वाहतुकीसाठी सुरु करा, माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी पालकमंत्र्यांकडे केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:59 IST

बालिंगा पुलावरून किमान चार चाकी व दुचाकी वाहने सुरू करण्यास परवानगी द्यावी

प्रकाश पाटीलकोपार्डे : बालिंगा पूल धोकादायक असल्याचे कारण देत राष्ट्रीय महामार्ग विभागाने सोमवार (दि.२४)पासून पुलावरुन वाहतूक बंद केली आहे. साबळेवाडी फाटा व नागदेवडी फाटा येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करून बॅरिकेट्स उभारून वाहतूक साबळेवाडी, खुपिरे, येवलुज, प्रयाग चिखली, आंबेवाडी मार्गे कोल्हापूरकडे वळवली आहे. यामुळे जनतेला मोठा त्रास होत असून या पुलावरील वाहतूक ताबडतोब सुरू करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. आज पालकमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा असल्याने यावर जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. नरके म्हणाले, जिल्ह्याच्या पश्चिम भागातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यातील दीड दोनशे गावांना बालिंगा पुलावरून वाहतूक बंद केल्याने मोठी गैरसोय होत असून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, रुग्ण यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. वरणगे पाडळी ते चिखली आंबेवाडी दरम्यान पुराचे पाणी कधीही रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. तशी परिस्थिती बालिंगा पुलावर नाही. यामुळे हा मार्गच लोकांच्या सोयीचा ठरणारा आहे.यामुळे बालिंगा पुलावरून किमान चार चाकी व दुचाकी वाहने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. आज पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर येत असून परिस्थितीचा आढावा घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी