शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

स्टार ८१८ वीस टक्के रुग्णांना होते आधीच आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करता यातील २० टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करता यातील २० टक्के नागरिकांना आधीच काही ना काही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातही रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

पहिल्या लाटेपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत अधिक मृत्यू झाले आहेत. साडेपाच महिन्यांत २५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६१ ते ७० या वयोगटातील म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू झाला असून तो २८ टक्क्यांच्यावर आहे. त्याखालोखाल ५१ ते ६० या वयोगटातील २२ टक्के नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

१ आलेख

वयोगट मृत्यू टक्केवारी

० ते १० ०० ००

११ ते २० ०० ००

२१ ते ३० ५० १.९६

३१ ते ४० २१२ ८.२९

४१ ते ५० ३६४ १४.२४

५१ ते ६० ५८१ २२.७३

६१ ते ७० ७२० २८.१७

७१ ते ८० ४५७ १७.८८

८१ ते ९० १५५ ६.०६

९१ ते १०० १६ ०.६३

१०० पेक्षा जास्त १ ०.०४

एकूण २५५६ १०० टक्के

२ सर्वांत जास्त शुगर, रक्तदाबाचे

या मृतांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास विविध तत्कालिन आजारामुळे जरी मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असली तरी मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. मधुमेह आणि रक्तदाब हे दोन्ही आजार असणाऱ्या मृत नागरिकांची संख्या ४०५ इतकी आहे. कोविडचा आजार हा प्रामुख्याने श्वसनाशी निगडित असल्याने साहजिकच हा त्रास असणाऱ्यांचा मृतांमध्ये आकडा जास्त आहे.

व्याधीचा प्रकार संख्या

रक्तदाब १४३

मधुमेह ९३

मधुमेह, रक्तदाब १६९

तीव्र यकृताचा आजार ०२

तीव्र फुप्फुसाचा आजार २२

तीव्र किडनीचे आजार १०

हृदयरोग २३

एचआयव्ही, कॅन्सरबाधित ३०

दोन, दोनपेक्षा अधिक व्याधी असलेले २६

एकूण ५१८

इली, सारी, श्वसनत्रास, ताप, अशक्तपणा, कफ, शौचाला लागणे यासारख्या लक्षणांनी मृत्यू १९७७

कोणत्याही व्याधी नसलेले ६१

३ किती तासांत किती जणांचा मृत्यू

रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर किती कालावधीमध्ये झाला, याचे विश्लेषण केले असता पाच दिवसांनंतरचे मृत्यू सर्वाधिक म्हणजे ४३.५१ टक्के इतके आहेत. म्हणजेच रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केला जातो. त्याला आधीच काही ना काही व्याधी असते. त्यामुळे पाच दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतरही त्याचा मृत्यू होतो. तसेच त्याखालोखाल रुग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासांत मृत्यू झालेल्यांची टक्केवारी ही १८.४४ टक्के इतकी आहे. रुग्ण अतिगंभीर झाल्यानंतर त्याला रुग्णालयात आणले जाते. त्यामुळे २४ तासांमधील मृत्यूंची संख्या वाढणारी दिसते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

तासमृत्यूटक्केवारी

२४ तास ४७० १८.४४

४८ तास २५७ १०.०८

७२ तास २७१ १०.६३

९६ तास २३८ ९.३४

१२० तास ११०९ ४३.५१