शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

(स्टार ७७१) सरकारची काटकसर... पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सरकारने पूरक पोषण आहारातून खाद्यतेलच गायब केले आहे. त्याऐवजी एक किलो साखर देऊन ...

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सरकारने पूरक पोषण आहारातून खाद्यतेलच गायब केले आहे. त्याऐवजी एक किलो साखर देऊन कोरोनाच्या या काळात गोड मानून घ्या, असे सरकारचे म्हणणे आहे, पण दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती अंगणवाडीतील पोषण आहार लाभार्थ्यांची झाली आहे. अंगणवाडीतून मिळणार हा आहार अनेक कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतो. पण आता सरकारची बचत या कुटुंबाच्या पोटावर मारणारी ठरत आहे.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अंगणवाड्यातून ३ ते ६ वयोगटातील बालके, किशोरी व गरोदर, स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार पुरवला जातो. अंगणवाडीमध्येच शिजवून तो बालकांना वाटला जात होता, पण कोरोना संसर्गामुळे शिजवण्यावर मर्यादा आल्याने तयार अन्नाऐवजी साहित्याचे पाकिट वाटण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन काळात गरजू लाभार्थ्यांना याचा चांगला लाभ झाल्याने याचेही कौतुकही झाले.

पोषण आहारात गहू, मसूर, मूग, चने, मीठ, तिखट, हळदीसह खाद्यतेलही अर्धा किलो दिले जात होते, पण आता तेलाचे दर सरासरी दीडशे ते पावनेदोनशे रुपये किलोवर गेल्याने सरकारने हात आखडता घेतला आहे. त्याऐवजी साखरेचा पर्याय काढला असला तरी तेलच नाही तर फोडणी कशाने करायची, असा सवाल लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.

चौकट

साहित्य वाटपात विस्कळीतपणा

गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनपासून दर दोन महिन्यांतून एकदा असे हे साहित्य वाटले जात होते. पण जानेवारीपासून यात विस्कळीतपणा आला आहे. मार्चमध्ये काही अंगणवाड्यांना हे साहित्य मिळाले, पण त्यानंतर ते कुणालाही दिलेले नाही. दोन दिवसांपूर्वी मार्चचे साहित्य आले असून ते वाटण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही एप्रील, मे महिन्यातील आलेले नसल्याने लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

काय मिळते

गहू दोन किलो, मसूर दोन किलो, चना दोन किलो, भरडलेली मूग डाळ व मसूर डाळ, साखर एक किलो, मीठ, तिखड, हळद पूड

प्रतिक्रिया

महिला बालविकास विभागाकडून धान्य उपलब्ध होईल, त्याप्रमाणे वाटप केले जात आहे. खाद्यतेल अर्धा किलाे दिले जात होते, पण आता पुरवठाच बंद झाला आहे. लाभार्थ्यांकडून विचारणा होते पण आम्ही काही करू शकत नाही.

शोभा भंडारे, अंगणवाडी सेविका, शिरोळ बालविकास प्रकल्प

अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या आहारातून चांगल्या प्रकारच्या कडधान्याची गरज भागत होती. खाद्यतेलही दिले जात असल्याने चांगली फोडणीही मारता येत होती. पण आधीच तेल महागल्याने घरातील स्वयंपाक महागला असताना शासनानेही देणे बंद केल्याने वाढीव खर्च कसा करायचा, याची आम्हाला चिंता आहे.

महादेवी कोळी, गरोदर माता, शिरटी

पोषण आहारात खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचे धोरण राज्य पातळीवरच ठरले असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेच्या पातळीवर फक्त त्याच्या वितरणाचे काम करत आहोत. लाभार्थ्यांच्या तक्रारी येत आहे, त्या नोंदवून घेऊन वरिष्ठांना कळवले जात आहे.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद