शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

(स्टार ७७१) सरकारची काटकसर... पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सरकारने पूरक पोषण आहारातून खाद्यतेलच गायब केले आहे. त्याऐवजी एक किलो साखर देऊन ...

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सरकारने पूरक पोषण आहारातून खाद्यतेलच गायब केले आहे. त्याऐवजी एक किलो साखर देऊन कोरोनाच्या या काळात गोड मानून घ्या, असे सरकारचे म्हणणे आहे, पण दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती अंगणवाडीतील पोषण आहार लाभार्थ्यांची झाली आहे. अंगणवाडीतून मिळणार हा आहार अनेक कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतो. पण आता सरकारची बचत या कुटुंबाच्या पोटावर मारणारी ठरत आहे.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अंगणवाड्यातून ३ ते ६ वयोगटातील बालके, किशोरी व गरोदर, स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार पुरवला जातो. अंगणवाडीमध्येच शिजवून तो बालकांना वाटला जात होता, पण कोरोना संसर्गामुळे शिजवण्यावर मर्यादा आल्याने तयार अन्नाऐवजी साहित्याचे पाकिट वाटण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन काळात गरजू लाभार्थ्यांना याचा चांगला लाभ झाल्याने याचेही कौतुकही झाले.

पोषण आहारात गहू, मसूर, मूग, चने, मीठ, तिखट, हळदीसह खाद्यतेलही अर्धा किलो दिले जात होते, पण आता तेलाचे दर सरासरी दीडशे ते पावनेदोनशे रुपये किलोवर गेल्याने सरकारने हात आखडता घेतला आहे. त्याऐवजी साखरेचा पर्याय काढला असला तरी तेलच नाही तर फोडणी कशाने करायची, असा सवाल लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.

चौकट

साहित्य वाटपात विस्कळीतपणा

गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनपासून दर दोन महिन्यांतून एकदा असे हे साहित्य वाटले जात होते. पण जानेवारीपासून यात विस्कळीतपणा आला आहे. मार्चमध्ये काही अंगणवाड्यांना हे साहित्य मिळाले, पण त्यानंतर ते कुणालाही दिलेले नाही. दोन दिवसांपूर्वी मार्चचे साहित्य आले असून ते वाटण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही एप्रील, मे महिन्यातील आलेले नसल्याने लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

काय मिळते

गहू दोन किलो, मसूर दोन किलो, चना दोन किलो, भरडलेली मूग डाळ व मसूर डाळ, साखर एक किलो, मीठ, तिखड, हळद पूड

प्रतिक्रिया

महिला बालविकास विभागाकडून धान्य उपलब्ध होईल, त्याप्रमाणे वाटप केले जात आहे. खाद्यतेल अर्धा किलाे दिले जात होते, पण आता पुरवठाच बंद झाला आहे. लाभार्थ्यांकडून विचारणा होते पण आम्ही काही करू शकत नाही.

शोभा भंडारे, अंगणवाडी सेविका, शिरोळ बालविकास प्रकल्प

अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या आहारातून चांगल्या प्रकारच्या कडधान्याची गरज भागत होती. खाद्यतेलही दिले जात असल्याने चांगली फोडणीही मारता येत होती. पण आधीच तेल महागल्याने घरातील स्वयंपाक महागला असताना शासनानेही देणे बंद केल्याने वाढीव खर्च कसा करायचा, याची आम्हाला चिंता आहे.

महादेवी कोळी, गरोदर माता, शिरटी

पोषण आहारात खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचे धोरण राज्य पातळीवरच ठरले असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेच्या पातळीवर फक्त त्याच्या वितरणाचे काम करत आहोत. लाभार्थ्यांच्या तक्रारी येत आहे, त्या नोंदवून घेऊन वरिष्ठांना कळवले जात आहे.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद