शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

(स्टार ७७१) सरकारची काटकसर... पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सरकारने पूरक पोषण आहारातून खाद्यतेलच गायब केले आहे. त्याऐवजी एक किलो साखर देऊन ...

कोल्हापूर : खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सरकारने पूरक पोषण आहारातून खाद्यतेलच गायब केले आहे. त्याऐवजी एक किलो साखर देऊन कोरोनाच्या या काळात गोड मानून घ्या, असे सरकारचे म्हणणे आहे, पण दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती अंगणवाडीतील पोषण आहार लाभार्थ्यांची झाली आहे. अंगणवाडीतून मिळणार हा आहार अनेक कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतो. पण आता सरकारची बचत या कुटुंबाच्या पोटावर मारणारी ठरत आहे.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अंगणवाड्यातून ३ ते ६ वयोगटातील बालके, किशोरी व गरोदर, स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार पुरवला जातो. अंगणवाडीमध्येच शिजवून तो बालकांना वाटला जात होता, पण कोरोना संसर्गामुळे शिजवण्यावर मर्यादा आल्याने तयार अन्नाऐवजी साहित्याचे पाकिट वाटण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन काळात गरजू लाभार्थ्यांना याचा चांगला लाभ झाल्याने याचेही कौतुकही झाले.

पोषण आहारात गहू, मसूर, मूग, चने, मीठ, तिखट, हळदीसह खाद्यतेलही अर्धा किलो दिले जात होते, पण आता तेलाचे दर सरासरी दीडशे ते पावनेदोनशे रुपये किलोवर गेल्याने सरकारने हात आखडता घेतला आहे. त्याऐवजी साखरेचा पर्याय काढला असला तरी तेलच नाही तर फोडणी कशाने करायची, असा सवाल लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.

चौकट

साहित्य वाटपात विस्कळीतपणा

गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनपासून दर दोन महिन्यांतून एकदा असे हे साहित्य वाटले जात होते. पण जानेवारीपासून यात विस्कळीतपणा आला आहे. मार्चमध्ये काही अंगणवाड्यांना हे साहित्य मिळाले, पण त्यानंतर ते कुणालाही दिलेले नाही. दोन दिवसांपूर्वी मार्चचे साहित्य आले असून ते वाटण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही एप्रील, मे महिन्यातील आलेले नसल्याने लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

काय मिळते

गहू दोन किलो, मसूर दोन किलो, चना दोन किलो, भरडलेली मूग डाळ व मसूर डाळ, साखर एक किलो, मीठ, तिखड, हळद पूड

प्रतिक्रिया

महिला बालविकास विभागाकडून धान्य उपलब्ध होईल, त्याप्रमाणे वाटप केले जात आहे. खाद्यतेल अर्धा किलाे दिले जात होते, पण आता पुरवठाच बंद झाला आहे. लाभार्थ्यांकडून विचारणा होते पण आम्ही काही करू शकत नाही.

शोभा भंडारे, अंगणवाडी सेविका, शिरोळ बालविकास प्रकल्प

अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या आहारातून चांगल्या प्रकारच्या कडधान्याची गरज भागत होती. खाद्यतेलही दिले जात असल्याने चांगली फोडणीही मारता येत होती. पण आधीच तेल महागल्याने घरातील स्वयंपाक महागला असताना शासनानेही देणे बंद केल्याने वाढीव खर्च कसा करायचा, याची आम्हाला चिंता आहे.

महादेवी कोळी, गरोदर माता, शिरटी

पोषण आहारात खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचे धोरण राज्य पातळीवरच ठरले असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेच्या पातळीवर फक्त त्याच्या वितरणाचे काम करत आहोत. लाभार्थ्यांच्या तक्रारी येत आहे, त्या नोंदवून घेऊन वरिष्ठांना कळवले जात आहे.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद