शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

Kolhapur News: शिळे अन्नच उठले गायींच्या जिवावर, कणेरी मठावरील गायी दगावल्यामुळे सुरु होती उलटसुलट चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:10 IST

कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट

कोल्हापूर : कणेरी मठावरील गायी नेमक्या कशामुळे दगावल्या, त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या, पण शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायी दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. मठातील कर्मचारी आणि व्यवस्थापकांचे अज्ञान निष्पाप गायींच्या जिवावर बेतले. या घटनेत घातपाताचा प्रकार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट लागले. या घटनेनंतर मठातील जबाबदार व्यक्तींनी सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे संभ्रम आणखी वाढला होता. एकाचवेळी मोठ्या संख्येने गायी दगावल्यामुळे घातपाताचा संशय बळावला होता. त्यासाठी मृत गायींचा व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

मात्र, कोल्हापुरातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालानुसार शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत गायींच्या पोटात विषबाधेचे अंश मिळाले नाहीत, त्यामुळे घातपात नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दगावलेल्या गायींची संख्या अजूनही स्पष्ट झालेली नाही.एवढे अज्ञान कसे?गेल्या २५ वर्षांपासून मठावर गायी-म्हशी सांभाळल्या जातात असे सांगितले जाते. मग जनावरांना काय खायला घालावे आणि काय घालू नये एवढेही ज्ञान व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांना नाही काय? जनावरांचा सांभाळ करण्याचा सल्ला इतरांना देणाऱ्या मठावरील व्यवस्थापनाचे हे अपयश असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंदूर सणालाही शेतकरी त्याच्याकडील जनावरांना शिजवलेला खिचडा फारसा घालत नाहीत. रवंथ करता येणार नाही, असा कोवळा हिरवा चारा घालत नाहीत. त्यामुळे मठावरील व्यवस्थापकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.ना समिती, ना चौकशीकणेरी मठावर गायी दगावल्यानंतर घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज अनेक संस्था, संघटनांनी व्यक्त केली. मात्र, मठासह शासन स्तरावरून याबाबत मौन बाळगण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी कोणतीही समिती नेमली नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिळे अन्न खाल्ल्यामुळेच कणेरी मठावरील गायी दगावल्याचे रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आता मठावरील कोणत्याही जनावराला औषधोपचाराची गरज नाही. यापुढे जनावरांना शिळे अन्न घालू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. - डॉ. वाय. ए. पठाण - पशुवैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर