शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Kolhapur News: शिळे अन्नच उठले गायींच्या जिवावर, कणेरी मठावरील गायी दगावल्यामुळे सुरु होती उलटसुलट चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:10 IST

कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट

कोल्हापूर : कणेरी मठावरील गायी नेमक्या कशामुळे दगावल्या, त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या, पण शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायी दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. मठातील कर्मचारी आणि व्यवस्थापकांचे अज्ञान निष्पाप गायींच्या जिवावर बेतले. या घटनेत घातपाताचा प्रकार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट लागले. या घटनेनंतर मठातील जबाबदार व्यक्तींनी सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे संभ्रम आणखी वाढला होता. एकाचवेळी मोठ्या संख्येने गायी दगावल्यामुळे घातपाताचा संशय बळावला होता. त्यासाठी मृत गायींचा व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

मात्र, कोल्हापुरातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालानुसार शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत गायींच्या पोटात विषबाधेचे अंश मिळाले नाहीत, त्यामुळे घातपात नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दगावलेल्या गायींची संख्या अजूनही स्पष्ट झालेली नाही.एवढे अज्ञान कसे?गेल्या २५ वर्षांपासून मठावर गायी-म्हशी सांभाळल्या जातात असे सांगितले जाते. मग जनावरांना काय खायला घालावे आणि काय घालू नये एवढेही ज्ञान व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांना नाही काय? जनावरांचा सांभाळ करण्याचा सल्ला इतरांना देणाऱ्या मठावरील व्यवस्थापनाचे हे अपयश असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंदूर सणालाही शेतकरी त्याच्याकडील जनावरांना शिजवलेला खिचडा फारसा घालत नाहीत. रवंथ करता येणार नाही, असा कोवळा हिरवा चारा घालत नाहीत. त्यामुळे मठावरील व्यवस्थापकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.ना समिती, ना चौकशीकणेरी मठावर गायी दगावल्यानंतर घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज अनेक संस्था, संघटनांनी व्यक्त केली. मात्र, मठासह शासन स्तरावरून याबाबत मौन बाळगण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी कोणतीही समिती नेमली नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिळे अन्न खाल्ल्यामुळेच कणेरी मठावरील गायी दगावल्याचे रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आता मठावरील कोणत्याही जनावराला औषधोपचाराची गरज नाही. यापुढे जनावरांना शिळे अन्न घालू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. - डॉ. वाय. ए. पठाण - पशुवैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर