शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एस.टी.ची वाहतूक सुरळीत - संप मागे : कोल्हापूर कर्मचाऱ्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:52 IST

एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

ठळक मुद्देएकजुटीमुळे संप यशस्वी-संघटनांचे नेते

कोल्हापूर : एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. संप मिटताच रात्री उपलब्ध होतील त्या कर्मचाऱ्यांमार्फत विविध मार्गांवर बसगाड्या सोडण्यात येत होत्या. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शनिवारी काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची गैरसोय टळली.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोणतीही घोषणाबाजी नाही, नुकसान करायचे नाही, असे नियम पाळत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. ‘बंद’मुळे संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांबाहेर शुकशुकाट होता. दोन दिवसांत कोल्हापूर विभागाचे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले. ‘शिवशाही’तर्फे दर अर्ध्या तासाने शिवशाही बसगाडी सोडण्यात येत आहे. या गाड्या, कºहाड, सातारामार्गे जात असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईतील बैठक यशस्वी झाल्याने संप मागे घेण्यात आला.२ हजार ८६५ कर्मचारी सहभागीकोल्हापूर जिल्ह्णात एस. टी. महामंडळाकडे प्रशासकीय, कार्यशाळा, चालक व वाहक असे एकूण चार हजार ८४४ कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण साप्ताहिक सुटी, दौरा, अधिकृत रजेवर आहेत. त्यापैकी शनिवारी २ हजार ८६५ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.दोन ‘शिवशाही’ बसची काच फोडलीशिरोली फाटा येथे शनिवारी मध्यरात्री कोल्हापूर-पुणे या शिवशाही गाडीची तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसवर नेसरीपासून दोन किलोमीटर अंतरावर अर्जुनवाडी फाट्यावर अज्ञात व्यक्तीने गाडी थांबविण्याचा हाताने इशारा करून वेग कमी झालेल्या बसच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.दिवसभरातील दृष्टिक्षेप

२५ शिवशाही बसगाड्यापुण्याकडे रवाना१ गाडी मुंबईकडे रवानारात्री आठपर्यंत फक्त२ हजार १८० फेऱ्या२८ हजार ८१४ फेऱ्या रद्द७० लाखांचे उत्पन्न बुडाले२ शिवशाही बसगाड्यांवर दगडफेकरात्री दहानंतर संप मागे.संभाजीनगर येथे जेवणाची व्यवस्थासंभाजीनगर आगार येथे परगावच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसस्थानकांबाहेर आगारातील कर्मचाºयांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना सकाळी एकवेळचे जेवण देऊन सर्वजण काम बंद आंदोलनात सहभागी झाले. 

मुंबईतील बैठकीत पगारवाढीबाबात सकारात्मक निर्णय झाल्याने आम्ही काम बंद आंदोलन मागे घेत आहे. सर्व कामगारांच्या एकजुटीमुळेच हे शक्य होऊ शकले.- उत्तम पाटील, विभागीय अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटनाराज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रेट्यामुळे प्रशासनास पगारवाढीबाबात योग्य निर्णय घेणे भाग पडले आहे. मनासारखी जरी पगारवाढ झाली नसली, तरी पगारवाढीच्या जवळपास गेलो आहे.- आप्पासाहेब साळोखे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)

टॅग्स :ST Strikeएसटी संपkolhapurकोल्हापूर