शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

एसआरपीएफ’ जवान पोलीसपदास मुकणार : शासनाचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:56 IST

राज्य राखीव पोलीस बल गटातील (एसआरपीएफ)जवानांना दहा वर्षांऐवजी पंधरा वर्षे सेवा केल्याने पोलीस दलात बदली होण्याचे स्वप्न भंगले आहे.

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : राज्य राखीव पोलीस बल गटातील (एसआरपीएफ)जवानांना दहा वर्षांऐवजी पंधरा वर्षे सेवा केल्याने पोलीस दलात बदली होण्याचे स्वप्न भंगले आहे. या नव्या धोरणामुळे शासनाने जवानांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. दहा वर्षांनंतर पोलीस दलात मिळणारी संधी हुकली आहे. शासनाच्या या नव्या धोरणाला जवानांनी विरोध केला आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा वर्षांचे नवे धोरण रद्द करण्याचे दिलेले आश्वासन फसवे ठरले आहे. या आडमुठ्या धोरणामुळे एसआरपीएफच्या जवानांच्या करिअरवर चाट आली आहे.

राज्यभरात राज्य राखीव दलाचे सोळा बलगट आहेत. कोल्हापूरसह पुणे, जालना, नागपूर, दौंड, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, गडचिरोली, हिंगोली, औरंगाबाद, गोंदिया आदी ठिकाणी सुमारे २० हजार जवान कार्यरत आहेत. कोल्हापूर बटालियनमध्ये ९५० जवान आहेत. त्यांच्या नोकरीच्या एकूण कालखंडापैकी ७५ टक्के कालावधी हा घरापासून दूर बंदोबस्तासाठी जातो. त्यांच्या खांद्यावर नक्षलग्रस्त विभाग, संवेदनशील ठिकाणी चोवीस तास पहारा ठेवण्याची जबाबदारी दिली जाते.

गोंदिया, गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात पंधरा तुकड्या तब्बल नऊ महिने तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी दोन-चार महिने कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी तैनात केल्या जातात. सण-समारंभ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्येही याच जवानांना पाचारण केले जाते. मिळेल त्या जागी मुक्काम अशी अवस्था जवानांची आहे. जवान कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. असंख्य आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.जवानांच्या या परिस्थितीचा विचार करून मागील शासनाने जवानांसाठी सलग दहा वर्षे राज्य राखीव पोलीस दलात सेवा बजावल्यावर पोलीस दलात दहा टक्के आरक्षणानुसार त्यांना पुन्हा नोकरीची संधी मिळत होती.

मात्र, शासनाने २१ आॅक्टोबर २०१६ रोजी आदेशात बदल करून ही बदली दहाऐवजी पंधरा वर्षांनी केली. या नव्या धोरणामुळे एसआरपीएफच्या जवानांना पोलीस दलात जाण्याची संधी हुकली आहे. या निर्णयाच्या विरोधात जवानांनी आंदोलने करून मुख्यमंत्र्यांसह तत्कालीन अप्पर मुख्य गृहसचिवांची भेट घेऊन नवीन आदेश रद्द करण्याची मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिले खरे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. शासन जवानांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे.काही जवान या पंधरा वर्षांच्या नव्या धोरणाच्या विरोधात ‘मॅट’मध्येही गेले आहेत. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे जवानांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. 

बदलीकरिता पंधरा वर्षांच्या सेवाज्येष्ठतेचा नियम लावल्याने पोलीस दलासाठी त्याचा फायदा जवानांना घेता येत नाही. हा नवीन नियम रद्द करून दहा वर्षांची जुनी कालमर्यादा बदलीकरिता निश्चित करावी, असा प्रस्ताव गृहविभागाला पाठविणार आहे.- के. व्ही. सपकाळे, अधीक्षक, राज्य राखीव पोलीस बलगट, कोल्हापूर

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर