शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शिंगणापूर उपसा केंद्रातील पाण्याची विनाबिलिंग उचल :चंद्रदीप नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:48 IST

शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.

ठळक मुद्देशिंगणापूर उपसा केंद्रातील पाण्याची विनाबिलिंग उचल :चंद्रदीप नरकेमहापालिकेकडे हिशेब नाही, चौकशी करण्याची मागणी

कोल्हापूर : शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.

हे पाणी गळतीमध्ये आणि चोरीमध्ये वाया जात आहे, परिणामी महानगरपालिकेला यामधून दरवर्षी सरासरी २५ कोटींचा तोटा होत आहे. शहरामध्ये पाणी गळती असणारी ४० ठिकाणे असून त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने कृती आराखडा तयार करावा, त्यानुसार महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार नरके यांनी यावेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूर शहर पाणी पुरवठा योजनेच्या जल लेखापरीक्षण (वॉटर आॅडिट) अहवालानुसार शहरासाठी शिंगणापूर उपसा केंद्रामधून ११२.१५ दशलक्ष लिटर्स, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांमधून ७७.२३ दशलक्ष लिटर्स व कळंबा तलाव येथून ३.४२ दशलक्ष लिटर्स असा एकूण १९२.८० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा केला जातो.

शहरासाठी १९२.८० दशलक्ष लिटर्स रोज होणाऱ्या पाणी उपशापैकी ३०.२१ टक्के पाण्याचे बिलिंग होत असून हिशेबबाह्य पाण्याचे प्रमाण ६९.२९ टक्के आहे. कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या दाब नलिका व गुरुत्ववाहिनीवर मोठ्या प्रमाणात गळती आहे.

सदर गळती काढण्याच्यादृष्टीने १०९.४९ लाखांचे अंदाजपत्रके महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी ६३.२० लाखांच्या अंदाजपत्रकांना महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. सदर कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून निविदा निश्चितीनंतर सदरची कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर