शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिंगणापूर उपसा केंद्रातील पाण्याची विनाबिलिंग उचल :चंद्रदीप नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:48 IST

शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.

ठळक मुद्देशिंगणापूर उपसा केंद्रातील पाण्याची विनाबिलिंग उचल :चंद्रदीप नरकेमहापालिकेकडे हिशेब नाही, चौकशी करण्याची मागणी

कोल्हापूर : शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.

हे पाणी गळतीमध्ये आणि चोरीमध्ये वाया जात आहे, परिणामी महानगरपालिकेला यामधून दरवर्षी सरासरी २५ कोटींचा तोटा होत आहे. शहरामध्ये पाणी गळती असणारी ४० ठिकाणे असून त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने कृती आराखडा तयार करावा, त्यानुसार महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार नरके यांनी यावेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूर शहर पाणी पुरवठा योजनेच्या जल लेखापरीक्षण (वॉटर आॅडिट) अहवालानुसार शहरासाठी शिंगणापूर उपसा केंद्रामधून ११२.१५ दशलक्ष लिटर्स, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांमधून ७७.२३ दशलक्ष लिटर्स व कळंबा तलाव येथून ३.४२ दशलक्ष लिटर्स असा एकूण १९२.८० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा केला जातो.

शहरासाठी १९२.८० दशलक्ष लिटर्स रोज होणाऱ्या पाणी उपशापैकी ३०.२१ टक्के पाण्याचे बिलिंग होत असून हिशेबबाह्य पाण्याचे प्रमाण ६९.२९ टक्के आहे. कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या दाब नलिका व गुरुत्ववाहिनीवर मोठ्या प्रमाणात गळती आहे.

सदर गळती काढण्याच्यादृष्टीने १०९.४९ लाखांचे अंदाजपत्रके महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी ६३.२० लाखांच्या अंदाजपत्रकांना महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. सदर कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून निविदा निश्चितीनंतर सदरची कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर