शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मराठा महासंघाचे वसंत मुळीक कोल्हापूर ‘उत्तर’मधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:52 IST

गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.

ठळक मुद्देमराठा महासंघाचे वसंत मुळीक कोल्हापूर ‘उत्तर’मधूननिवडणूक लढवण्याची घोषणा : काँग्रेसच्या उमेदवारीस प्राधान्य

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुळीक यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसला प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र तेथून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उतरण्यासही मागे-पुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. मुळीक म्हणाले, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेली तीस वर्षे मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे संघटन करत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आहे. मराठा समाजाचे प्रश्र्न मांडतानाही सातत्याने इतर सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या बळावर निवडणूकीला सामोरे जावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रथम काँग्रेसकडून तिकीट मागावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आमचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आपण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’बबन रानगे म्हणाले, गेली ३० वर्षे समाजकार्यात असलेला सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, हे आपण दाखवून दिले पाहिजे. ‘एक नोट - एक व्होट’ याप्रमाणे मुळीक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे.इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘सरकारकडून सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. प्रतिगाम्यांचे विचार रोखायचे असतील तर मुळीक यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, ‘आपल्या समाजकार्यातून वसंतराव हे सर्व समाजांच्या तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. फक्त संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाही, तर ते मार्गी लावण्यासाठी राजकारणात यावे लागते. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय सत्ताही महत्त्वाची आहे.’शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले. यावेळी आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, ख्रिश्चन समाजाचे अनंत म्हाळुंगेकर, अनिल पाटील, अमरसिंह पाटील, छावा संघटनेचे किसन लोहार, उत्तम कांबळे, डॉ. संदीप पाटील, मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघvidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर