शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा शिक्षक देणार मुक्त ‘खेळा’चे धडे : नव्या वर्षापासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:25 IST

शहरात जागेची अडचण आहे. मातीत खेळू नकोस, इन्फेक्शन होईल, अशी भीती लहान वयात मुलांना घातली जाते. पालकांनाही वेळ नसल्याने ते आपल्या मुलांना लहान वयातच संगणक व मोबाईलवेडे बनवत आहेत.

ठळक मुद्दे कोल्हापूर शहरातील क्रीडा शिक्षकांचा पुढाकार

प्रदीप शिंदेकोल्हापूर : ‘दिवेलागणीची वेळ झाली, खेळ पुरे, आता घरात या...’, ही हाक काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरांतून सर्रास ऐकू यायची. घरापुढील अंगणही नाहीसे झाले... आणि अंगणातील अनेक खेळ नुसते आठवणीतच उरले आहेत. टीव्ही, मोबाईलमुळे मैदानी खेळ कमी होत आहेत. त्यामुळे लहान वयातच मुलांना आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत. हीच समस्या सोडविण्यासाठी क्रीडा शिक्षक एकत्र येऊन ‘मुक्त’ खेळाचे धडे देणार आहेत.शहरात वेगवेगळ्या कारणांसाठी मुलांवर सुरक्षिततेची कुंपणे घातल्याने मुले खेळांपासून दूर जात आहेत. शहरात जागेची अडचण आहे. मातीत खेळू नकोस, इन्फेक्शन होईल, अशी भीती लहान वयात मुलांना घातली जाते. पालकांनाही वेळ नसल्याने ते आपल्या मुलांना लहान वयातच संगणक व मोबाईलवेडे बनवत आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे मुलांचे खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे गल्ली, कॉलनी, मैदानावरील किलबिलाट नाहीसा झाला आहे. लहान मुले आता नुसतीच टेक्नोसेव्ही झाली आहेत. शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातील मुलेदेखील मोबाईल गेममध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे मुलांचे जमिनीपासूनचे नातेच तुुटायला लागले आहे. मैदानी खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत.कोणत्याही खेळातून कौशल्य, एकाग्रता आणि नेतृत्वपणा या सर्व गोष्टी शिकण्यास मिळतात. तीच गोष्ट रूजविण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.असे आहेत क्रीडा शिक्षक

क्रीडा शिक्षक प्रदीप साळुंखे, रघुनाथ पाटील, अमित शिंत्रे, रवी पाटील, शैलेश देवणे, रंगराव पाटील, दिलीप साखळकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी क्रीडा अधिकारी अरुण पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

  • मुक्त खेळ

नव्या वर्षापासून या उपक्रमास सुरुवात होणार आहे. ३ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहेत. यामध्ये तुम्ही काहीपण खेळा, पण मनसोक्त खेळा हीच अट असणार आहे. सागरगोटे, काचापाणी, भातुकली, गोट्या, विटी-दांडू, पकडापकडी, चोर-पोलीस यासारखे खेळ असणार आहेत. प्रत्येक रविवारी शहरातील विविध ठिकाणी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत हे मुक्त खेळ खेळले जाणार आहेत.

 

विविध खेळांमधून आनंदासोबतच व्यायामपण होतो. मात्र, आता मुळातच खेळच खेळले जात नसल्याने मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्या कमी करण्यासाठी क्रीडा शिक्षक एकत्र आलो आहोत.- प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षकशाळा सुरू झाली की, सकाळी क्लासनंतर शाळा, मग पुन्हा सायंकाळी क्लास, सुट्टीचा क्लास, त्यामुळे मुले खेळणेच विसरले आहेत. त्यांना पुन्हा खेळांकडे वळविण्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतला आहे.- रघुनाथ पाटील, क्रीडा शिक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक