शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

खंडपीठासाठी कोल्हापुरात महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग

By उद्धव गोडसे | Updated: February 18, 2025 14:23 IST

तीन मागण्या; तीन निवेदने

कोल्हापूर : खंडपीठ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!, कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे.. अशा घोषणा देत जिल्हा बार असोसिएशनने महारॅलीद्वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तीन निवेदने दिली. मंगळवारी सकाळी निघालेल्या रॅलीत वकिलांसह विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी सहभाग घेतला. सर्व निवेदने तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवावित असे अवाहन वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना केले.राज्य सरकार आणि न्याय यंत्रणांचे खंडपीठाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनने मंगळवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून महारॅली काढत जिल्हाधिका-यांना निवेदने दिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना निवेदन देऊन महारॅलीला सुरुवात झाली. पितळी गणपती मंदिर, धैर्यप्रसाद हॉल चौक, ताराराणी चौक, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे रॅली दसरा चौकात पोहोचली.तिथे खंडपीठासाठी उपोषणाला बसलेले माणिक पाटील-चुयेकर यांचा भेट घेऊन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेली. बार असोसिएशनच्या पदाधिका-यांसह शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांनी भेट घेऊन तीन निवेदने दिली. तसेच सर्व निवेदने मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वकिलांनी घोषणाबाजी करीत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. महारॅलीत वकिलांसह विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि काही संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी सहभाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

सहा जिल्ह्यातील पदाधिका-यांचा सहभागलक्षवेध महारॅलीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सहभाग घेऊन खंडपीठाचे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. महारॅलीत ज्युनिअर वकिलांची संख्या लक्षणीय होती. 

तीन मागण्या ; तीन निवेदने

  • कोल्हापुरातील खंडपीठाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीच बैठक आयोजित करावी. मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन खंडपीठाचा निर्णय जाहीर करावा.
  • कोल्हापूर हा नवीन महसूल विभाग जाहीर करून आयुक्तालय सुरू करावे.
  • झारखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ज्युनिअर वकिलांसाठी पाच वर्ष दरमहा स्टायपेंड सुरू करावा. तसेच ज्येष्ठ वकिलांसाठी दरमहा पेन्शन सुरू करावी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयadvocateवकिल