शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

स्पेशल मुलाखत :  विदेशातील भारतीयांची बौद्धिक संपदा देशासाठी : ज्ञानेश्वर मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:28 IST

Primeministerdepartment, kolhapurnews, interview प्रभास या आंतरमंत्रालयीन उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचे सुपुत्र, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची निवड झालेली आहे. त्यांच्या या नव्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी हा संवाद.

ठळक मुद्दे स्पेशल मुलाखत :  विदेशातील भारतीयांची बौद्धिक संपदा देशासाठी : ज्ञानेश्वर मुळेप्रभासच्या व्यासपीठावर जगातील दीड हजार भारतीय एकत्र

संदीप आडनाईक कोल्हापूर : प्रभास या आंतरमंत्रालयीन उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचे सुपुत्र, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची निवड झालेली आहे. त्यांच्या या नव्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी हा संवाद.प्रश्न : प्रभास समिती म्हणजे नेमके काय ?उत्तर : कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्चमार्फत स्थापन केलेल्या ह्यप्रवासी भारतीय सायंटिफिक ॲण्ड अकॅडेमिक संपर्कह्ण अर्थात प्रभास ही भारत सरकारची समिती आहे. विदेशातील भारतीय शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, विशेषज्ञ, स्कॉलर्स यांना तसेच भारतातील तज्ज्ञ, विशेषज्ञ, शास्त्रज्ञ यांना एकत्र आणून भारतातील समस्यांसाठी एकत्रित काम करण्यासाठी तयार केलेले पोर्टल म्हणून ह्यप्रभासह्ण काम करणार आहे. याचे कार्यक्षेत्र संपूर्ण जगभर आहे.प्रश्न : प्रभास पोर्टलमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे?उत्तर : जगभरात सुमारे तीन कोटी भारतीय वंशाच्या व्यक्ती आणि अनिवासी भारतीय राहतात. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यवसाय, व्यवस्थापन आणि वित्तीय क्षेत्रांत काम करणाऱ्या आणि परदेशात त्या त्या क्षेत्रात नाव कमावलेल्या या व्यक्तींना आणि शास्त्रज्ञांना प्रभासच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आणले आहे. प्रभासमध्ये डीआरडीओ, इस्रो, ऑटोमिक एनर्जी कमिशन, आयसीएआर, आयसीएमआर, सीएसआयआरचे वरिष्ठ अधिकारी यांसारख्या भारतातील सगळ्या प्रमुख वैज्ञानिक प्रयोगशाळा, कौन्सिल्स आणि संस्था या समितीचे सदस्य आहेत. याशिवाय विदेश मंत्रालय तसेच विज्ञान, तंत्रज्ञान मंत्रालयाचा यात मोठा सहभाग आहे.प्रश्न : प्रभासचे नेमके काम काय असणार आहे ?उत्तर : आतापर्यंत विदेशांतील शास्त्रज्ञांचा भारतासाठी फार कमी उपयोग केला गेला. आता या व्यासपीठामुळे भरीव मदत उपलब्ध होणार आहे. शिवाय कोणता प्रकल्प कोण करीत आहे, याची माहितीही एकाच वेळी समजणार आहे. यामुळे देशाच्या प्रकल्पांमध्ये एकवाक्यता येईल.प्रश्न : प्रभासच्या पहिल्या बैठकीत काय ठरले ?उत्तर : भारत सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या समितीचे काम चालणार आहे. पर्यावरण, आरोग्य आणि गरिबी या तीन प्रमुख समस्यांवर उपाययोजना शोधणे हे या समितीचे प्रमुख काम आहे. २२ ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने पहिली बैठक झाली. त्यात या पोर्टलची प्रगती काय झाली, याचा आढावा घेतला. जगातील १५०० निमंत्रितांपैकी १९१ विदेशी भारतीय शास्त्रज्ञ आणि अनिवासी भारतीय उपस्थित होते.प्रश्न : याद्वारे थेट आर्थिक लाभ देण्याची योजना आहे का ?कोणत्याही व्यक्तीला आर्थिक लाभ मिळण्याऐवजी बौद्धिक संपदेच्या आधारे देशासाठी पर्यावरण, सामाजिक, आर्थिक यांसारख्या समस्यांवर उपाय शोधले जातील आणि भारत जगभरात अग्रणी ठरण्यासाठी पुढाकार घेईल, असा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होणार आहे. यातून केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाला बळ मिळणार आहे. मी महाराष्ट्रात केलेल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी घेऊन ही समिती कार्यरत होईल.

प्रगल्भ आणि वैज्ञानिक बुद्धीचा वापर करून भारतीयांच्या समस्यांवर उपाययोजना शोधणाऱ्या प्रदीर्घ प्रकल्पांची निर्मिती प्रभासच्या समितीमार्फत करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

टॅग्स :prime ministerपंतप्रधानkolhapurकोल्हापूर