शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर फोडून सोने उगवणारा ‘चाळके - द माउंटनमॅन’ -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:03 IST

दशरथ आयरे । अणुस्कुरा : आपल्या गावातील रस्त्यात असलेली टेकडीची अडचण व त्यामुळे झालेला पत्नीचा मृत्यू यामुळे पेटून उठलेला ...

ठळक मुद्देशाहूवाडीतील कांटे गावचा शेतकरी घण, सुतकी घेऊन डोंगराशी टक्कर; चार एकर शेती फुलविली

दशरथ आयरे ।अणुस्कुरा : आपल्या गावातील रस्त्यात असलेली टेकडीची अडचण व त्यामुळे झालेला पत्नीचा मृत्यू यामुळे पेटून उठलेला बिहारमधील दशरथ मांझी सर्वांच्याच परिचयाचा आहे. २५ फूट उंचीचा डोंगर हातोडा-चिन्हीने फोडून रस्ता करणाऱ्या दशरथ यांच्या जीवनावर मांझी-द माउंटनमॅन हा चित्रपटही प्रसिद्ध होऊन गेला. असेच एक माउंटनमॅन शाहूवाडी तालुक्याच्या डोंगरी व दुर्गम भागातील कांटे या गावातील ८0 वर्षीय आनंदा लक्ष्मण चाळके हे प्रसिद्धीस आले आहेत.

आपल्या परिवाराच्या उपजीविकेसाठी गेल्या ४0 वर्षांपासून एकट्याने रात्रंदिवस राबून खडकाळ डोंगर फोडून चार एकर शेतजमीन तयार केली. त्या जमिनीत ऊस व मका पीक जोमाने बहरले आहे.चाळके २0-२२ वर्र्षांचे असताना मोलमजुरीसाठी मुंबईला गेले; पण वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना गावी परतावे लागले. परिणामी, कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली. उदरनिर्वाहाचे साधन काहीच नव्हते. होता फक्त वडिलोपार्जित काळ्या दगडांचा डोंगर.

रोजगार मिळेना. कुटुंबाची उपासमार होऊ लागली. त्यामुळे त्यांनी ठरवले की, या डोंगराशी दोन हात करायचे आणि ते कामाला लागले. त्या दिवसापासून त्यांचे घण, सुतकी, टिकाव, फावडे घेऊन काळ्या दगडांशी टक्कर देणे सुरू झाले. दगड-धोंड्यांशी चाललेला हा संघर्ष गेली ४0 वर्षे आजही सुरूच आहे. सकाळी उठायचे ते थेट दगडाला भिडायचे. रस्त्याने ये-जा करणाºया लोकांनी त्यांना वेड्यात काढले; पण दुर्लक्ष करीत ते राबतच राहिले. पत्नीने आणलेली भाकर खाताना तेवढाच काय तो घडीभर विसावा. आठवड्यातून एक दिवस दुसºयाच्या शेतावर पत्नीसोबत मजुरीला जायचे व त्याच पैशांवर घरखर्च भागवायचे हा त्यांचा नियम आजही कायम आहे.

सतत ४0 वर्षे राबून चार एकर शेतजमीन तयार केली. या जमिनीत पिके घेण्यासाठी त्यांच्याबरोबर मुलगाही साथ देत आहे. उर्वरित डोंगर फोडण्याचे काम आजअखेर सुरूच आहे. चाळके मामांनी आयुष्यभर चप्पल घातलेले नाही. वर्षातून दोन वेळाच ते दाढी करतात. नवीन कपडे फक्त दिवाळी व होळीलाच घालतात, अशी साधी राहणी. मात्र, आता डोलणारी पिके पाहून कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते. आता हातात पूर्वीसारखी ताकत राहिली नाही. शरीर थकले आहे. तरीपण देहात जीव असेपर्यंत या डोंगरातील दगडांची माती करण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.80 वर्षीय आनंदा लक्ष्मण चाळके हे शाहूवाडी तालुक्यातील कांटे येथील रहिवासी.40 वर्षांपासून कच्च्या दगडांचा खडकाळ डोंगर फोडून तयार केली चार एकर शेतजमीन20 वर्र्षांचे असताना मोलमजुरीसाठी मुंबईला गेले; पण वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना गावी परतावे लागले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी