शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

मांडणशिल्पातून स्वप्नांची पेरणी

By admin | Updated: February 13, 2017 00:46 IST

शिवोत्सव : कलागुणांच्या उधळणीत रंगला तिसरा दिवस

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या तरुणाईच्या कलाविष्काराचे शिखर ठरलेल्या ‘शिवोत्सव’ महोत्सवात रविवारचा दिवस कलागुणांच्या मुक्त उधळणीत न्हाऊन निघाला. ‘माय ड्रीम’ या थीमवर आधारित मांडणशिल्पातून देशभरातून आलेल्या विविध विद्यापीठांच्या कलाकारांनी स्वप्नांची पेरणी केली.तिसऱ्या दिवसाच्या महोत्सवाची सुरुवात मांडणशिल्प कलाप्रकाराने झाली. मानव्यशास्त्र इमारतीसमोरील आवारात झालेल्या स्पर्धेत झाडाच्या फांद्या, गवत, पाने, फुले, विटा, वर्तमानपत्रांची रद्दी, फुटक्या पाईप्स, मोकळे बॉक्स, कागदी प्लेट्स, आदी मिळेल त्या वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांनी कलाकृतींची मांडणी केली. त्यामध्ये पंधरा संघांनी सहभाग घेतला. राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘ग्रीन सोसायटी, क्लीन सोसायटी’ ही संकल्पना मांडत विकासासोबत पर्यावरणाचाही तितकाच विचार करायला हवा आणि फक्त समस्यांवर चर्चा न करता पारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करून प्रदूषण कसे कमी करता येईल, हेदेखील मांडले. गुलबर्गा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकाचे स्वप्न ही संकल्पाने मांडत मेक इन इंडिया, कॅशलेस सोसायटी, स्वच्छ भारत अभियान, आदी माध्यमांतून कसा प्रगतिपथावर जात आहे याची मांडणी केली; तर रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाने युवा पिढीच खऱ्या अर्थाने शांतीचं प्रतीक बनू शकते, हे आपल्या कलाकृतीतून मांडण्याचा प्रयत्न केला. रांची विद्यापीठाने आपल्या कलाकृतींतून जागतिक शांततेचा संदेश दिला. पंजाबच्या लव्हली विद्यापीठाने प्लास्टिकच्या वापरामुळे समाजजीवन कसे भोवऱ्यात अडकले आहे, त्याची मांडणी केली. देशातील विविधता व त्यातून एकतेची भावना संगीताच्या माध्यमातून कशी गुंफण्यात आली आहे, त्याची प्रचिती लोककला केंद्रात सादर झालेल्या सुगम गीतगायनातून आली. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कलाकारांनी ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा अभंग सादर केला; तर पंजाबमधून आलेल्या ‘मैं जिसे पूज रहा था वो पत्थर निकला’, ‘अगर तलाश करूॅँ कोई मिल जाएगा... मगर तुम्हारी तरहा कौन मुझे चाहेगा’ अशा गजला सादर केल्या. त्यानंतर विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी स्थानिक भाषेतील प्रसिद्ध रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एकांकिकांनी गाजविला दिवसमहोत्सवातील एकांकिका स्पर्धेत एकूण पंधरा संघांनी सहभाग घेतला. वि. स. खांडेकर भाषाभवनातील एकांकिका स्पर्धेत तिसऱ्या दिवशीच्या एकांकि केची सुरुवात भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी वृत्तपत्रविद्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या तुफान विनोदी ‘क्यों मारा’ या हास्यनाटिकेने झाली. त्यानंतर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या संघाने ‘वेलकम’ ही वेगळ्या विषयावरील एकांकिका सादर केली. मनुष्यजीवनापासून मुक्तीनंतरच खऱ्या अर्थाने नव्या जगण्याचे वेलकम होते, असा आशय असलेल्या या कलाकृतीने उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुवाहाटीच्या कॉटन कॉलेजने स्त्रियांच्या वर्तमान स्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘और एक शकुंतला’मधून सामाजिक प्रश्नांची मांडणी केली.‘नोटाबंदी’वरील वादविवाद रंगला‘आर्थिक विकासासाठी नोटा निश्चलनीकरण हा एकमेव उपाय’ या विषयावर निलांबरी सभागृहात आयोजित वादविवाद बौद्धिक चर्चा, दाखले, संदर्भ दाखले यांनी रंगला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी घेण्यात आलेला सर्वांत योग्य निर्णय म्हणून केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे एक बाजूला स्वागत करून समर्थन करण्यात आले; तर दुसऱ्या बाजूने या निर्णयाला कडाडून विरोध करीत हा निर्णय गरिबांना अधिकाधिक गरिबीच्या खाईत लोटणारा आहे, असा कडाडून प्रतिवादही करण्यात आला. सलाम इंडियन आर्मीमहोत्सवात मांडणशिल्प कलाप्रकारात सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘माय ड्रीम’ या संकल्पनेवर आधारित सैन्यदलातील जवानांच्या खडतर जीवनप्रवासावर आधारित कलाकृती मांडली. युद्धप्रसंगी त्याला ज्या कठीण परिस्थतीशी सामना करावा लागतो, त्या भावना कलाकृतीतून मांडल्या. या कलाकृतीची मांडणी संगमेश्वर बिराजदार, ओंकार साठे, प्रदीप भद्रशेट्टी, विक्रांतसिंह चव्हाण या विद्यार्थ्यांनी केली.