शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

कोल्हापूर : पाऊस सुरु झाल्याच्या पंधरा दिवसांतच जिल्ह्यात पेरणीक्षेत्राने तब्बल ७६ टक्केवर झेप घेतली आहे. साधारणपणे जून महिन्यात २० ...

कोल्हापूर : पाऊस सुरु झाल्याच्या पंधरा दिवसांतच जिल्ह्यात पेरणीक्षेत्राने तब्बल ७६ टक्केवर झेप घेतली आहे. साधारणपणे जून महिन्यात २० ते ३० टक्क्यांवर असणारा खरीप पेरा यंदा मात्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यातच दुप्पटी, तिप्पटीने वाढला आहे. सर्वाधिक ८२ टक्के पेरणी साेयाबीनची झाली आहे. त्याखालोखाल भुईमूग ६७ टक्केवर पेरणी झाली आहे. भाताची रोप लागण होणारे डोंगरी तालुके वगळता इतरत्र पेरणीचा टक्का चांगलाच सुधारला असून या हातकणंगले, शिरोळ, कागल हे तालुके आघाडीवर आहेत.

दरवर्षी जूनमध्ये पेरण्या सुरु होतात. पावसाचा अंदाज घेऊन जुलैपर्यंत त्या सुरुच राहतात. यावर्षी मात्र पेरण्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासू्नच सुरुवात झाली. मृग नक्षत्र निघेपर्यंत जिल्ह्यात जवळपास ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यातच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त जिल्ह्यात पाच-सहा दिवस तुफानी पाऊस कोसळला. त्यामुळे पेरण्यांचा वेग आणखी वाढला. पिकांची उगवणही चांगली झाली. केवळ नदीकाठ व सखल भागात पाणी साचून राहिल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला, पण ऊन पडल्याने या पिकांना बऱ्यापैकी जीवदान मिळाले.

जिल्ह्यात भाताच्या धूळवाफ पेरण्यांची उगवण चांगली झाली असून आता रोप लागण सुरू झाल्याने पुढील आठवड्यात पेरणीची टक्केवारी आणखी वाढणार आहे. दरम्यान आता पावसाने काहीशी ओढ दिल्याने रोप लागणीला म्हणावा तसा वेग नाही. अजून आठ दिवस तुरळकच पाऊस असणार आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस जोर धरणार असल्याने त्याप्रमाणे लागणीचे नियोजन केले जात आहे.

यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने सोयाबीनच्या पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४१ हजार ५३८ हेक्टर आहेत, त्यापैकी ३४ हजार २०३ हेक्टरवर म्हणजेच ८२ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

प्रतिक्रिया

यावर्षी वादळी पाऊस व त्यानंतर मृग नक्षत्रातही चांगला पाऊस झाल्याने पेरण्या लवकर पूर्ण झाल्या आहेत. पिकांची उगवणही समाधानकारक आहे. कोल्हापूर पेरणीत राज्यात आघाडीवर दिसत आहे.

ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

भात : ९३ ७४२ ४७०१८ ५०.१६

ज्वारी : २३३१ १२६४ ५४.२३

भुईमूग : ३९१७६ २६५५३ ६७.७८

सोयाबीन : ४१५३८ ३४२०३ ८२.३४

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी झालेले

हातकणंगले ४४८३० ३७३१३

शिरोळ २८०१९ २८०७१

पन्हाळा २८६२८ २१४४९

शाहूवाडी २०२६१ १११९४

राधानगरी २८९५० १६७८०

गगनबावडा ६५९८ ४३१८

करवीर ४०३०१ ३१८९५

कागल ४२७७० ३७२०२

गडहिंग्लज ३९०८५ ३६०००

भूदरगड २६३०८ १८७२३

आजरा २१९८४ १२२८६

चंदगड ३५४२१ १९४९१

एकूण ३६३१५४ २७४७२३