शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर पेरणी, ३१ टक्के पूर्ण : रब्बी हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:25 IST

farmar, sataranews अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी ४३ तर जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ३१ झाली आहे. अजूनही काही भागात वापसा नसल्याने यंदा गहू अन् हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर पेरणी, ३१ टक्के पूर्ण : रब्बी हंगाम उशीर झाल्याने गहू अन् हरभरा क्षेत्रात होणार वाढ

सातारा : अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी ४३ तर जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ३१ झाली आहे. अजूनही काही भागात वापसा नसल्याने यंदा गहू अन् हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. गहू ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस यांचे क्षेत्र अत्यल्प आहे.ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून काही तालुक्यांत रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीस सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला. तर काही ठिकाणी ज्वारी पिकाचे नुकसान झाले. सध्या जिल्ह्यातील पेरणी ३०.४८ टक्के झाली आहे. तर ६६ हजार ७९२ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे.ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यांतही ज्वारीचे क्षेत्र आहे. ज्वारीची आतापर्यंत ५९ हजार ६७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची आतापर्यंत १.५३ टक्के, मका ३०.०३ आणि हरभऱ्याची ९.३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.खटाव तालुक्यात ५१ टक्के क्षेत्रावर पेरणी...जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कºहाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी खटाव तालुक्यात ५०.८४ टक्के झाली आहे. त्यानंतर माणमध्ये ४२ टक्के झाली आहे. तर फलटण ३३, सातारा तालुका ३२, वाई ३०.५४, कऱ्हाड तालुक्यात २१.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर इतर तालुक्यात पेरणीचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर