शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:54 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.

ठळक मुद्देपेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगलीशिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या

कोल्हापूर : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मृग नक्षत्र निघाल्यानंतर मात्र आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली. या कालावधीत पेरण्यांचा सपाटा लावण्यात आला. त्यानंतर चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने पेरण्यांची घाई उडाली; पण एकसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे पेरण्या करणे अवघड होऊन बसले आहे. त्यातही निचऱ्याच्या जमिनी असलेल्या ठिकाणी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची भर पावसात घाई सुरू आहे. खोल, गाळाच्या जमिनीत मात्र अजिबातच वाफसा नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत.रोहिणी आणि मृगात झालेले भात, सोयाबीन, भुईमूग चांगले उगवले आहे. भातामध्ये कोळपणी, भांगलणीची कामे भरपावसात सुरू आहेत. रोपलागणीसाठी टाकलेले नाचणी व भाताचे तरवे चांगलेच तरालले आहे. पुढील पंधरवड्यात याच्या लागणी सुरू होतील. उसालाही मिरगी डोस देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.आडसाली लावणी सुरूआडसाली आणि पूर्व हंगामी ऊसलागणीचे पूर्वनियोजन म्हणून आता सऱ्या पाडून ठेवण्यात आल्या आहेत. बोंडल्यावर सोयाबीन, भुईमूग, मूग पेरून सरीमध्ये लावण करण्याचे नियोजन आहे. आता आडसाली लावणी सुरू झाल्या असून आतापर्यंत ७०३ हेक्टरवरील लावणी पूर्णही झाल्या आहेत.पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • भात - ४६ हजार ९३१
  • ज्वारी - ७८५
  • नागली - १ हजार ६८५
  • भुईमूग - १६हजार २६८
  • सोयाबीन - २४ हजार ६०५
  • ऊस - ७०३

कृषी विभागाकडे नोंद झाल्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ७४ हजार ६३९ हेक्टरपैकी ९३ हजार ५६१ हेक्टरवर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. यात भाताची पेरणी सर्वाधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर