शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:54 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.

ठळक मुद्देपेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगलीशिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या

कोल्हापूर : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मृग नक्षत्र निघाल्यानंतर मात्र आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली. या कालावधीत पेरण्यांचा सपाटा लावण्यात आला. त्यानंतर चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने पेरण्यांची घाई उडाली; पण एकसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे पेरण्या करणे अवघड होऊन बसले आहे. त्यातही निचऱ्याच्या जमिनी असलेल्या ठिकाणी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची भर पावसात घाई सुरू आहे. खोल, गाळाच्या जमिनीत मात्र अजिबातच वाफसा नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत.रोहिणी आणि मृगात झालेले भात, सोयाबीन, भुईमूग चांगले उगवले आहे. भातामध्ये कोळपणी, भांगलणीची कामे भरपावसात सुरू आहेत. रोपलागणीसाठी टाकलेले नाचणी व भाताचे तरवे चांगलेच तरालले आहे. पुढील पंधरवड्यात याच्या लागणी सुरू होतील. उसालाही मिरगी डोस देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.आडसाली लावणी सुरूआडसाली आणि पूर्व हंगामी ऊसलागणीचे पूर्वनियोजन म्हणून आता सऱ्या पाडून ठेवण्यात आल्या आहेत. बोंडल्यावर सोयाबीन, भुईमूग, मूग पेरून सरीमध्ये लावण करण्याचे नियोजन आहे. आता आडसाली लावणी सुरू झाल्या असून आतापर्यंत ७०३ हेक्टरवरील लावणी पूर्णही झाल्या आहेत.पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • भात - ४६ हजार ९३१
  • ज्वारी - ७८५
  • नागली - १ हजार ६८५
  • भुईमूग - १६हजार २६८
  • सोयाबीन - २४ हजार ६०५
  • ऊस - ७०३

कृषी विभागाकडे नोंद झाल्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ७४ हजार ६३९ हेक्टरपैकी ९३ हजार ५६१ हेक्टरवर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. यात भाताची पेरणी सर्वाधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर