शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:54 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.

ठळक मुद्देपेरण्या २५ टक्के, पावसाने उगवण चांगलीशिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या

कोल्हापूर : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पावसाच्या उघडिपीवरच पेरण्या आटोपण्याची तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे.जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मृग नक्षत्र निघाल्यानंतर मात्र आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली. या कालावधीत पेरण्यांचा सपाटा लावण्यात आला. त्यानंतर चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने पेरण्यांची घाई उडाली; पण एकसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे पेरण्या करणे अवघड होऊन बसले आहे. त्यातही निचऱ्याच्या जमिनी असलेल्या ठिकाणी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची भर पावसात घाई सुरू आहे. खोल, गाळाच्या जमिनीत मात्र अजिबातच वाफसा नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत.रोहिणी आणि मृगात झालेले भात, सोयाबीन, भुईमूग चांगले उगवले आहे. भातामध्ये कोळपणी, भांगलणीची कामे भरपावसात सुरू आहेत. रोपलागणीसाठी टाकलेले नाचणी व भाताचे तरवे चांगलेच तरालले आहे. पुढील पंधरवड्यात याच्या लागणी सुरू होतील. उसालाही मिरगी डोस देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.आडसाली लावणी सुरूआडसाली आणि पूर्व हंगामी ऊसलागणीचे पूर्वनियोजन म्हणून आता सऱ्या पाडून ठेवण्यात आल्या आहेत. बोंडल्यावर सोयाबीन, भुईमूग, मूग पेरून सरीमध्ये लावण करण्याचे नियोजन आहे. आता आडसाली लावणी सुरू झाल्या असून आतापर्यंत ७०३ हेक्टरवरील लावणी पूर्णही झाल्या आहेत.पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • भात - ४६ हजार ९३१
  • ज्वारी - ७८५
  • नागली - १ हजार ६८५
  • भुईमूग - १६हजार २६८
  • सोयाबीन - २४ हजार ६०५
  • ऊस - ७०३

कृषी विभागाकडे नोंद झाल्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ७४ हजार ६३९ हेक्टरपैकी ९३ हजार ५६१ हेक्टरवर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. यात भाताची पेरणी सर्वाधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर