शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

इचलकरंजीतील पूरग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीची पाणी पातळीत किंचित घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात चार इंचाने पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीची पाणी पातळीत किंचित घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात चार इंचाने पाणी उतरले असून, पातळी ७८ फुटांवर स्थिर आहे. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महापुरामुळे सुमारे २० हजार नागरिकांनी स्थलांतर केले आहे.

शहरात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पंचगंगेचे पाणी ओसरू लागले आहे. रविवारी (दि.२५) सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी ७८ फूट ४ इंचावर पोहचली होती. सोमवार सकाळपासून पाणी पातळीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता पाणी पातळी ४ इंचाने कमी होऊन ७८ फूट इतकी झाली. संथ गतीने पाणी ओसरत असले तरीही पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, नदीवेस, गावभाग व मळे भागातील सुमारे २० हजार नागरिक स्थलांतरित झाले असून त्यापैकी सुमारे साडेचार हजार नागरिकांनी पालिकेच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. जनावरांसाठीही छावण्यांची सोय करण्यात आली असून त्यामध्ये ५०० हून अधिक जनावरांची सोय केली आहे.