शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न सोडवण्यास महागोंड ग्रामस्थ एकवटले :गट-तट, हेवेदावे बाजूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:24 IST

उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत

ठळक मुद्देचाळीस वर्षांत प्रथमच झाले आंबेओहळचे पात्र श्रमदानातून खुले

रवींद्र येसादे ।उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून श्रमदानातून या पाणीप्रश्नासाठी झटत आहेत. ग्रामस्थांनी आंबेओहळचे १ कि.मी.चे पात्र गाळाने पूर्ण भरले होते ते गावकऱ्यांनी श्रमदानाने स्वच्छ केल्याने पावसाळ्यानंतर ग्रामस्थांना मुलबक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गावाशेजारीच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

गावातून नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण या विभागातील नोकरदार मंडळी गेले दोन महिने एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करीत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरदार मंडळी पुणे, मुंबई येथे बैठकीस हजर झाली. बैठकीस १५ कलमी आराखडा गावच्या विकासासाठी तयार करण्यात आला. त्यानंतर गावात ग्रामस्थांशी संवाद साधून गावात राजकारणविरहित गावसभा उत्साहात पार पडली.

जेथून पाणीसाठा करावयाचा आहे तेथे जलअभियंत्यांकडून पाहणी करण्यात आली. कृषी विभागानेही ग्रामस्थांचे काम पाहून ग्रामस्थांशी सहकार्याची भूमिका घेतली. सर्वांनी गावच्या हितासाठी एकत्र राहण्याचे ठरले. गावकºयांचे प्रबोधनही सभा घेऊन करण्यात आले. गावास पाण्याचे महत्त्व समजल्यावर महिलाही कामासाठी सरसावल्या.

गावच्या आंबेओहळ पात्रानजीक असणाºया सार्वजनिक नळपाणी योजनेशेजारी ग्रामस्थांनी गाळांनी साचलेले २० फूट रुंद व १० फूट उंच पात्र श्रमदान व जेसीबीने ४० वर्षांत पहिल्यांदाच खुले केले. वझरे भागातून या पात्रात मोठे पाणी वाहून पावसाळ्यात येते. बंधाºयात पाणीसाठा झाला तर जॅकवेलला पाणीसाठा होईल. शेजारी असणाºया कूपनलिकेच्या पाणीसाठ्यातही वाढ होईल.

सध्या या कूपनलिकेचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागतो. कूपनलिकेचे पाणी जॅकवेलमधून सोडून ते दोन-तीन दिवसांतून एकदा सार्वजनिक नळांना दिले जाते. यावर उपाय म्हणून ग्रामस्थ एकत्रित येत काम सुरू केले. आंबेओहळ पात्र खुले झाल्याने जून महिन्यातच पाणीसाठा होणार आहे.पहिल्या टप्प्यातील ही कामे पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्याने ग्रामस्थांसह मुंबई व पुणेकर मंडळींनी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गाळमुक्त केला. जॅकवेल दुरुस्ती व गावतलावाची डागडुजी ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.जलयुक्त शिवार योजना राबविणारशासनाने महागोंड गावास जलयुक्त शिवार योजना दिल्यास ती पूर्ण क्षमतेने राबवून गावास जलसमृद्धी करण्याची योजना गावकºयांनी आखली आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन ही योजना मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीटंचाई