शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

पाणीप्रश्न सोडवण्यास महागोंड ग्रामस्थ एकवटले :गट-तट, हेवेदावे बाजूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:24 IST

उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत

ठळक मुद्देचाळीस वर्षांत प्रथमच झाले आंबेओहळचे पात्र श्रमदानातून खुले

रवींद्र येसादे ।उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून श्रमदानातून या पाणीप्रश्नासाठी झटत आहेत. ग्रामस्थांनी आंबेओहळचे १ कि.मी.चे पात्र गाळाने पूर्ण भरले होते ते गावकऱ्यांनी श्रमदानाने स्वच्छ केल्याने पावसाळ्यानंतर ग्रामस्थांना मुलबक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गावाशेजारीच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

गावातून नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण या विभागातील नोकरदार मंडळी गेले दोन महिने एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करीत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरदार मंडळी पुणे, मुंबई येथे बैठकीस हजर झाली. बैठकीस १५ कलमी आराखडा गावच्या विकासासाठी तयार करण्यात आला. त्यानंतर गावात ग्रामस्थांशी संवाद साधून गावात राजकारणविरहित गावसभा उत्साहात पार पडली.

जेथून पाणीसाठा करावयाचा आहे तेथे जलअभियंत्यांकडून पाहणी करण्यात आली. कृषी विभागानेही ग्रामस्थांचे काम पाहून ग्रामस्थांशी सहकार्याची भूमिका घेतली. सर्वांनी गावच्या हितासाठी एकत्र राहण्याचे ठरले. गावकºयांचे प्रबोधनही सभा घेऊन करण्यात आले. गावास पाण्याचे महत्त्व समजल्यावर महिलाही कामासाठी सरसावल्या.

गावच्या आंबेओहळ पात्रानजीक असणाºया सार्वजनिक नळपाणी योजनेशेजारी ग्रामस्थांनी गाळांनी साचलेले २० फूट रुंद व १० फूट उंच पात्र श्रमदान व जेसीबीने ४० वर्षांत पहिल्यांदाच खुले केले. वझरे भागातून या पात्रात मोठे पाणी वाहून पावसाळ्यात येते. बंधाºयात पाणीसाठा झाला तर जॅकवेलला पाणीसाठा होईल. शेजारी असणाºया कूपनलिकेच्या पाणीसाठ्यातही वाढ होईल.

सध्या या कूपनलिकेचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागतो. कूपनलिकेचे पाणी जॅकवेलमधून सोडून ते दोन-तीन दिवसांतून एकदा सार्वजनिक नळांना दिले जाते. यावर उपाय म्हणून ग्रामस्थ एकत्रित येत काम सुरू केले. आंबेओहळ पात्र खुले झाल्याने जून महिन्यातच पाणीसाठा होणार आहे.पहिल्या टप्प्यातील ही कामे पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्याने ग्रामस्थांसह मुंबई व पुणेकर मंडळींनी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गाळमुक्त केला. जॅकवेल दुरुस्ती व गावतलावाची डागडुजी ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.जलयुक्त शिवार योजना राबविणारशासनाने महागोंड गावास जलयुक्त शिवार योजना दिल्यास ती पूर्ण क्षमतेने राबवून गावास जलसमृद्धी करण्याची योजना गावकºयांनी आखली आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन ही योजना मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीटंचाई