शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

कृषी विभागानेच शेतीची केली माती; कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजारांवर माती परीक्षण अहवाल कपाटात पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:40 IST

अहवालच आला नसेल तर शेतकरी करणार काय?

आयुब मुल्लाखोची : जिल्ह्यातील शेतीचे आरोग्य तपासणीचे काम करणारी यंत्रणा संथ गतीने सवडीने वाटचाल करीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी तपासणीसाठी जिल्ह्यातून घेतलेले १० हजार २०० नमुने अद्याप जैसे थे आहेत. मातीच्या नमुन्यांचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत. खरीप संपला, रब्बी संपत आला तरी मातीचा पोत सक्षम आहे की खराब आहे हे सांगण्यास कृषी विभाग पुढे आलेला नाही. त्यामुळे कृषी विभागाची कार्यक्षमताच तपासण्याची वेळ आली आहे.भरघोस उत्पादनाचा मंत्र कळणात तरी कसा..

  • वापरा माती परिक्षणाचे तंत्र असे म्हणत शेतकऱ्यांमध्ये जागृती करणारा माती परीक्षण विभाग कृतीमध्ये मात्र गतिमान झालेला नाही. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी रासायनिक खतांचा अतिरिक्त असंतुलित वापर केला जातो. पाण्याचा अयोग्य वापरसुद्धा होताना दिसतो. 
  • जमिनी सतत पिकाखाली राहिल्यामुळे सुपीकता कमी होऊन उत्पादन घटू लागले आहे. अशावेळी जमिनीचे आरोग्य कसे आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याचे मार्गदर्शन माती माती परीक्षण अहवालातून मिळते. यासाठी माती परीक्षणाची मोहीम कृषी विभागाने हाती घेतली होती. 
  • राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मे महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांची निवड केली. त्या गावातील प्रत्येकी ८५ शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचे नमुने तपासणीसाठी संकलित केले. त्यानुसार एका तालुक्यातील ८५० या प्रमाणे एकूण १० हजार २०० नमुने संकलित झाले. 
  • जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदचाचणी येथील प्रयोग शाळेत त्याची तपासणी सुरू झाली. परंतु अजून तपासणीचे काम निम्म्यापर्यंत आले आहे. हीच स्थिती राहिली तर संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी सव्वा वर्षाचा कालावधी लागू शकतो. सात महिने झाले तरी मातीचे आरोग्य कळणार नसेल तर शेतकऱ्यांनी शेती करायची तरी कशी, हाच खरा प्रश्न आहे.

विभागात रोज चौघेच कामावरशेतकरी स्वतःहून माती परीक्षणासाठी आले तर त्यांना साधी तपासणी हवी असेल तर ३५ रुपये व सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणीसाठी २०० रुपये फी घेऊन दोन आठवड्यात तपासणी करून दिली जाते. मुळातच या विभागात एक अधिकारी, एक सुपरवायझर व चार कृषी सहायक यांची नेमणूक आहे. परंतु रजा व अन्य कारणाने बहुधा चौघेच काम पाहतात. त्यामुळे तपासणी गतीने करणे जिकिरीचे झाले आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करून हा विभाग अधिक सतर्क करणे गरजेचे आहे.

सेंद्रिय कर्ब सुधारण्याची गरजसेंद्रिय कर्बमुळे जमिनीचा पोत सुधारतो. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी या तालुक्यातील मातीमध्ये ०.६१ ते १.०० टक्के म्हणजे भरपूर तर उर्वरित गगनबावडा, गडहिंग्लज, हातकणंगले, कागल, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यात ०.४१ ते ०.६० टक्के म्हणजे सेंद्रिय कर्बाची पातळी मध्यम आहे.

शेतकरी विविध प्रकारे प्रयोगशील शेती करीत आहे. मातीचे आरोग्य समजले तर सुपीकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे सोपे होते. त्यामुळे कृषी विभागाने माती परीक्षण करून तात्काळ त्याची माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. - संजय चोपडे, शेतकरी, लाटवडे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र