शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

लोकशाही मजबूतीसाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:11 IST

सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे केले.

ठळक मुद्देलोकशाही मजबूतीसाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा : दौलत देसाईशिवाजी विद्यापीठात ‘निवडणुका आणि सोशल मीडिया’वर परिसंवाद

कोल्हापूर : सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्यातर्फे आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

‘निवडणुका आणि सोशल मीडिया’ असा परिसंवादाचा विषय होता. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सोशल मीडियाच्या वापराबाबत तरुण पिढी आणि सर्वच स्तरांमध्ये संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विवेक, संवाद, सुसंवाद या त्रिसूत्रीचा उपयोग सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने केला पाहिजे.कार्यक्रमात छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विभागीय माहिती संचालक सतीश लळित, आयटी तज्ज्ञ राजेंद्र पारिजात, सोलापूर विद्यापीठाचे डॉ. रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ