शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रस्त्यांसाठी २५ हजांरावर झाडांची कत्तल, वनखातेही अनभिज्ञ 

By समीर देशपांडे | Updated: March 22, 2025 15:29 IST

कंत्राटदारांवर कुणाचाच अंकुश नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील २० रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आतापर्यंत २५ हजार ४३४ झाडांची तोड केली आहे, परंतु या बदल्यात कंत्राटदारांनी चौपट झाडे लावायची हाेती. ती लावली का? आणि लावली तर जगली का?, याची खातरजमा कोण करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत कंत्राटदारांची कामे सुरू आहेत, तोपर्यंतच त्यांच्याकडून ही झाडे लावून जगवून घेण्याची गरज आहे.गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात चौफेर असलेल्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. कागल सातारा, केर्ले रत्नागिरी ते राष्ट्रीय महामार्ग, फुलेवाडी ते गगनबावडा, रत्नागिरी कोल्हापूर, हातकणंगले ते चोकाक, संकेश्वर आंबोली, नांदगाव नांदारी, मुदाळ तिट्टा ते यमगे, सूळये ते हेरे, बाजार भोगाव ते अनुस्कुरा, केर्ली कोतोली नांदगाव, परखंदळे कळे गगनबावडा, सांगशी खोकुर्ले, पडळवाडी ते शिये अशा २० रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. यातील काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.या रस्त्यांच्या रुंदीकरणावेळी दुतर्फा असलेली अनेक झाडे तोडावी लागली आहेत. आजऱ्यासारख्या ठिकाणी तर दोन्ही बाजूच्या वडाच्या झाडांच्या कमानी होत्या. गर्द सावली देत असलेली ही अतिशय जुनी झाडेही तोडली आहेत. जिल्ह्यात या कामांसाठी मनाई असलेली ३ हजार ३०७ आणि मनाई नसलेली २२ हजार १२७ अशी एकूण २५ हजार ४३४ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, त्या बदल्यात झाडे कुठल्या कंत्राटदाराने किती लावली आणि जगवली याची माहिती कुणाकडेच नाही.चौपट झाडे लावण्याची अटरस्त्याच्या कामासाठी जितकी झाडे तोडली जातील त्याच्या चौपट झाडे लावण्याची अट निविदामध्ये घातलेली असते. त्याच भागात किंबहुना पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावावीत अशी अट असते. परंतु, कंत्राटदार याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. छोटी झाडे आणून लावायचे आणि फाेटो काढून ठेवायचे, असे प्रकार होत असल्याचे समजते. एकतर १०० टक्के झाडे जगत नसतात. त्यामुळे मेलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नवी झाडे लावून ती जगवण्याचीच अट असताना जिल्ह्यात तसे होताना दिसत नाही. 

उपवनसंरक्षकांचे पत्रयाच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, विशेष प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, व्यवस्थापक व प्रकल्प संचालक परियोजना कार्यान्वय इकाई या चार विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून या रस्त्यांच्या दुतर्फा गेल्या दोन वर्षांत किती झाडे लावली, याची माहिती मागवली असून, या पावसाळ्यात किती लावणार आहेत, याचीही माहिती मागवली आहे.

तोडलेली झाडे

  • मनाई असलेली ३,३०७
  • बिगर मनाई २२,१२७
  • एकूण २५,४३४
  • (मनाई असलेल्या झाडांमध्ये आंबा, फणस, वड, पिंपळ, चिंच, साग, ऐन, किंजळ यांसारख्या झाडांचा समावेश होतो.)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग