शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Kolhapur: रस्त्यांसाठी २५ हजांरावर झाडांची कत्तल, वनखातेही अनभिज्ञ 

By समीर देशपांडे | Updated: March 22, 2025 15:29 IST

कंत्राटदारांवर कुणाचाच अंकुश नाही

समीर देशपांडेकोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील २० रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आतापर्यंत २५ हजार ४३४ झाडांची तोड केली आहे, परंतु या बदल्यात कंत्राटदारांनी चौपट झाडे लावायची हाेती. ती लावली का? आणि लावली तर जगली का?, याची खातरजमा कोण करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत कंत्राटदारांची कामे सुरू आहेत, तोपर्यंतच त्यांच्याकडून ही झाडे लावून जगवून घेण्याची गरज आहे.गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात चौफेर असलेल्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. कागल सातारा, केर्ले रत्नागिरी ते राष्ट्रीय महामार्ग, फुलेवाडी ते गगनबावडा, रत्नागिरी कोल्हापूर, हातकणंगले ते चोकाक, संकेश्वर आंबोली, नांदगाव नांदारी, मुदाळ तिट्टा ते यमगे, सूळये ते हेरे, बाजार भोगाव ते अनुस्कुरा, केर्ली कोतोली नांदगाव, परखंदळे कळे गगनबावडा, सांगशी खोकुर्ले, पडळवाडी ते शिये अशा २० रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. यातील काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.या रस्त्यांच्या रुंदीकरणावेळी दुतर्फा असलेली अनेक झाडे तोडावी लागली आहेत. आजऱ्यासारख्या ठिकाणी तर दोन्ही बाजूच्या वडाच्या झाडांच्या कमानी होत्या. गर्द सावली देत असलेली ही अतिशय जुनी झाडेही तोडली आहेत. जिल्ह्यात या कामांसाठी मनाई असलेली ३ हजार ३०७ आणि मनाई नसलेली २२ हजार १२७ अशी एकूण २५ हजार ४३४ झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, त्या बदल्यात झाडे कुठल्या कंत्राटदाराने किती लावली आणि जगवली याची माहिती कुणाकडेच नाही.चौपट झाडे लावण्याची अटरस्त्याच्या कामासाठी जितकी झाडे तोडली जातील त्याच्या चौपट झाडे लावण्याची अट निविदामध्ये घातलेली असते. त्याच भागात किंबहुना पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावावीत अशी अट असते. परंतु, कंत्राटदार याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. छोटी झाडे आणून लावायचे आणि फाेटो काढून ठेवायचे, असे प्रकार होत असल्याचे समजते. एकतर १०० टक्के झाडे जगत नसतात. त्यामुळे मेलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नवी झाडे लावून ती जगवण्याचीच अट असताना जिल्ह्यात तसे होताना दिसत नाही. 

उपवनसंरक्षकांचे पत्रयाच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, विशेष प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, व्यवस्थापक व प्रकल्प संचालक परियोजना कार्यान्वय इकाई या चार विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून या रस्त्यांच्या दुतर्फा गेल्या दोन वर्षांत किती झाडे लावली, याची माहिती मागवली असून, या पावसाळ्यात किती लावणार आहेत, याचीही माहिती मागवली आहे.

तोडलेली झाडे

  • मनाई असलेली ३,३०७
  • बिगर मनाई २२,१२७
  • एकूण २५,४३४
  • (मनाई असलेल्या झाडांमध्ये आंबा, फणस, वड, पिंपळ, चिंच, साग, ऐन, किंजळ यांसारख्या झाडांचा समावेश होतो.)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग