शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

एसएमई लिस्टिंगसाठी कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्याचे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 17:27 IST

भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(सूचीबद्ध) व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देभांडवल उभारणीसाठी ‘बीएसई-एसएमई’कडे वाढता कल : अजय ठाकूर कोल्हापूरमधील कंपन्यांसाठी प्रयत्न सुरूपश्चिम महाराष्ट्रात परिवर्तन होईल : ठाकूर

कोल्हापूर : भांडवल उभारणीसाठी लघु व मध्यम उद्योगांचा (एसएमई) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ‘बीएसई-एसएमई’ या स्वतंत्र व्यासपीठाकडे कल वाढत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पावले टाकत आहोत. कोल्हापुरातील जास्तीत जास्त कंपन्या एसएमई लिस्टिंग(सूचीबद्ध) व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.शेअरबाजार विषयक माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेनिमित्त ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकूर म्हणाले, बीएसई-एसएमईची सुरुवात सन २०१२ मध्ये झाली. ते देशातील पहिले एसएमई एक्सचेंज आहे. या एक्सचेंज अंतर्गत २१२ कंपन्या लिस्टिंग झाल्या आहेत.

कंपन्यांना व्यवसायातील नवीन संधी निर्माण होत असतात. त्यासह कर्जाची पुनर्रबांधणीसाठी त्यांना भांडवलाची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना त्यांची कंपनी बीएसई लिस्ट करुन आपले शेअर्स विकता येतात. त्यामुळे भांडवल उभारणीसाठी बीएसई-एसएमईकडील लिस्टिंगचा एक चांगला पर्याय आहे.

या पत्रकार परिषदेस सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिेसेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष विनय भागवत, एसपी वेल्थ अ‍ॅडव्हायझर्सचे अध्यक्ष अनिल पाटील, कंपनी सेक्रेटरी अमित दाधीच, आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात परिवर्तन होईलमुंबई, नागपूर, सूरत, अहमदाबाद कंपन्यांचा बीएसई-एसएमईमध्ये लिस्टिंग होण्यासाठी सहभाग वाढत आहे. पुण्यातील अनेक कंपन्यांची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले, यातुलनेत आर्थिक साक्षरतेचा अभाव, शेअरबाजारची माहिती नसणे, लिस्टिंग झाल्यानंतर तक्रारी वाढतील अशा स्वरुपातील विविध भ्रमांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कंपन्या मागे आहेत. अशीच काहीशी पंजाब, दिल्लीमधील स्थिती होती. योग्य माहिती तेथील उद्योजक, कंपन्यांना मिळाल्याने त्यांचा सहभाग वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताºयामध्ये देखील अशा स्वरुपातील परिर्वतन होईल. यादृष्टीने येथे आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत......................................................................................(संतोष मिठारी)

टॅग्स :share marketशेअर बाजारkolhapurकोल्हापूर