शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गाळप हंगामाला वेग, सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:06 IST

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे.

ठळक मुद्देविभागात सात दिवसांत दोन लाख ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप सरासरी साखर उतारा ७.३५ टक्क्यांवर

कोल्हापूर : राज्यातील सत्तारोहणाच्या घडामोडींत व्यस्त असतानाही गळीत हंगामावर कोणताही परिणाम झालेला नाही. ऊस परिषदेनंतर अधिकृतपणे सुरू झालेल्या गाळपानुसार गेल्या सात दिवसांत कोल्हापूर विभागातील १० कारखान्यांनी दोन लाख ४५ हजार २१२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ७.३५ टक्के आहे. दरम्यान, हंगाम वेग घेत असताना अजूनही विभागातील सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरीच आहे. त्यात वारणा कारखान्याचा अपवाद वगळता उर्वरित सहा कारखान्यांच्या सुरू होण्यावरच अनिश्चिततेचे सावट आहे.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी गव्हाणीत मोळ्या टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ केला; पण ऊस परिषदेच्या धास्तीमुळे गाळपाला दबकतच सुरुवात केली होती. परिषदेत आंदोलनाची भूमिका ठरलेली नसल्याचा फायदा उचलत २२ पासूनच अधिकृतपणे गळितास सुरुवात झाली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात आजच्या घडीला कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापुरातील १९ व सांगलीतील १२ असे ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. कोल्हापुरातील जवाहर व सांगलीतील सर्वोदय व विश्वास हे दोन कारखाने १ डिसेंबरला सुरू होत आहेत.

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे. हंगाम सुरू होईल की नाही, याबाबतच आता साशंकता व्यक्त होत आहे. सांगलीतील माणगंगा कारखान्याने हंगाम सुरूच करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महांकाली, तासगाव, डफळे- जत, यशवंत- खानापूर हे कारखाने चालू करण्याबाबत अनिश्चितता दिसत आहे.आता प्रतीक्षा बैठकीचीआता हंगामाने वेग घेतला असला तरी पहिली उचल किती मिळणार हे अजून ठरलेले नाही. एफआरपी अधिक २०० रुपये अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ऊस परिषदेनंतर साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक होणार होती; पण राज्यातील सत्तास्थापनेत सर्वचजण गुंतल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक कधी होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.उता-यात ‘खासगी’ सरसकोल्हापूर विभागात गेल्या सात दिवसांत झालेल्या गाळपातून एक लाख ८० हजार २७० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उतारा मात्र केवळ ७.३५ टक्के आहे. त्यातही खासगी कारखाने सरस ठरले आहेत. त्यांचा उतारा ७.३७ टक्के, तर सहकारी कारखान्यांचा ७.३४ टक्के आहे. विभागात राजाराम सहकारी कारखान्याचा १.३३ टक्के इतका सर्वांत कमी उतारा आहे; तर सांगलीच्या ‘उदगिरी शुगर’ या खासगी कारखान्याचा ९.४४ टक्के इतका सर्वोच्च उतारा नोंदविला गेला आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर