शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

गाळप हंगामाला वेग, सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:06 IST

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे.

ठळक मुद्देविभागात सात दिवसांत दोन लाख ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप सरासरी साखर उतारा ७.३५ टक्क्यांवर

कोल्हापूर : राज्यातील सत्तारोहणाच्या घडामोडींत व्यस्त असतानाही गळीत हंगामावर कोणताही परिणाम झालेला नाही. ऊस परिषदेनंतर अधिकृतपणे सुरू झालेल्या गाळपानुसार गेल्या सात दिवसांत कोल्हापूर विभागातील १० कारखान्यांनी दोन लाख ४५ हजार २१२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ७.३५ टक्के आहे. दरम्यान, हंगाम वेग घेत असताना अजूनही विभागातील सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरीच आहे. त्यात वारणा कारखान्याचा अपवाद वगळता उर्वरित सहा कारखान्यांच्या सुरू होण्यावरच अनिश्चिततेचे सावट आहे.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी गव्हाणीत मोळ्या टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ केला; पण ऊस परिषदेच्या धास्तीमुळे गाळपाला दबकतच सुरुवात केली होती. परिषदेत आंदोलनाची भूमिका ठरलेली नसल्याचा फायदा उचलत २२ पासूनच अधिकृतपणे गळितास सुरुवात झाली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात आजच्या घडीला कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापुरातील १९ व सांगलीतील १२ असे ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. कोल्हापुरातील जवाहर व सांगलीतील सर्वोदय व विश्वास हे दोन कारखाने १ डिसेंबरला सुरू होत आहेत.

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे. हंगाम सुरू होईल की नाही, याबाबतच आता साशंकता व्यक्त होत आहे. सांगलीतील माणगंगा कारखान्याने हंगाम सुरूच करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महांकाली, तासगाव, डफळे- जत, यशवंत- खानापूर हे कारखाने चालू करण्याबाबत अनिश्चितता दिसत आहे.आता प्रतीक्षा बैठकीचीआता हंगामाने वेग घेतला असला तरी पहिली उचल किती मिळणार हे अजून ठरलेले नाही. एफआरपी अधिक २०० रुपये अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ऊस परिषदेनंतर साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक होणार होती; पण राज्यातील सत्तास्थापनेत सर्वचजण गुंतल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक कधी होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.उता-यात ‘खासगी’ सरसकोल्हापूर विभागात गेल्या सात दिवसांत झालेल्या गाळपातून एक लाख ८० हजार २७० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उतारा मात्र केवळ ७.३५ टक्के आहे. त्यातही खासगी कारखाने सरस ठरले आहेत. त्यांचा उतारा ७.३७ टक्के, तर सहकारी कारखान्यांचा ७.३४ टक्के आहे. विभागात राजाराम सहकारी कारखान्याचा १.३३ टक्के इतका सर्वांत कमी उतारा आहे; तर सांगलीच्या ‘उदगिरी शुगर’ या खासगी कारखान्याचा ९.४४ टक्के इतका सर्वोच्च उतारा नोंदविला गेला आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर