शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

गाळप हंगामाला वेग, सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:06 IST

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे.

ठळक मुद्देविभागात सात दिवसांत दोन लाख ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप सरासरी साखर उतारा ७.३५ टक्क्यांवर

कोल्हापूर : राज्यातील सत्तारोहणाच्या घडामोडींत व्यस्त असतानाही गळीत हंगामावर कोणताही परिणाम झालेला नाही. ऊस परिषदेनंतर अधिकृतपणे सुरू झालेल्या गाळपानुसार गेल्या सात दिवसांत कोल्हापूर विभागातील १० कारखान्यांनी दोन लाख ४५ हजार २१२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ७.३५ टक्के आहे. दरम्यान, हंगाम वेग घेत असताना अजूनही विभागातील सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरीच आहे. त्यात वारणा कारखान्याचा अपवाद वगळता उर्वरित सहा कारखान्यांच्या सुरू होण्यावरच अनिश्चिततेचे सावट आहे.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी गव्हाणीत मोळ्या टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ केला; पण ऊस परिषदेच्या धास्तीमुळे गाळपाला दबकतच सुरुवात केली होती. परिषदेत आंदोलनाची भूमिका ठरलेली नसल्याचा फायदा उचलत २२ पासूनच अधिकृतपणे गळितास सुरुवात झाली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात आजच्या घडीला कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापुरातील १९ व सांगलीतील १२ असे ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. कोल्हापुरातील जवाहर व सांगलीतील सर्वोदय व विश्वास हे दोन कारखाने १ डिसेंबरला सुरू होत आहेत.

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे. हंगाम सुरू होईल की नाही, याबाबतच आता साशंकता व्यक्त होत आहे. सांगलीतील माणगंगा कारखान्याने हंगाम सुरूच करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महांकाली, तासगाव, डफळे- जत, यशवंत- खानापूर हे कारखाने चालू करण्याबाबत अनिश्चितता दिसत आहे.आता प्रतीक्षा बैठकीचीआता हंगामाने वेग घेतला असला तरी पहिली उचल किती मिळणार हे अजून ठरलेले नाही. एफआरपी अधिक २०० रुपये अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ऊस परिषदेनंतर साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक होणार होती; पण राज्यातील सत्तास्थापनेत सर्वचजण गुंतल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक कधी होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.उता-यात ‘खासगी’ सरसकोल्हापूर विभागात गेल्या सात दिवसांत झालेल्या गाळपातून एक लाख ८० हजार २७० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उतारा मात्र केवळ ७.३५ टक्के आहे. त्यातही खासगी कारखाने सरस ठरले आहेत. त्यांचा उतारा ७.३७ टक्के, तर सहकारी कारखान्यांचा ७.३४ टक्के आहे. विभागात राजाराम सहकारी कारखान्याचा १.३३ टक्के इतका सर्वांत कमी उतारा आहे; तर सांगलीच्या ‘उदगिरी शुगर’ या खासगी कारखान्याचा ९.४४ टक्के इतका सर्वोच्च उतारा नोंदविला गेला आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर