शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी कोल्हापुरातील रेंदाळ येथे गायरानातील झाडांची कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:59 IST

हुपरी : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा प्रकल्प रेंदाळ (ता. हातकणंगले) ...

हुपरी : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा प्रकल्प रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील २५ एकर गायरानात उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प उभारण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीने वनीकरणातील शेकडो झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करून ग्रामस्थांचा रोष ओढवून घेतला आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने पाच हेक्टर जागा देण्याचा ठराव दिला असताना प्रत्यक्षात मात्र १० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकल्पातून गावच्या यंत्रमाग व्यवसायास व पाणीपुरवठा योजनेला मोफत वीजपुरवठा करण्याबरोबरच अन्य मागण्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केल्या आहेत. त्याकडे मक्तेदार कंपनी व महावितरणने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अत्यंत घाईगडबडीने कामास सुरुवात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शासनाच्या या चांगल्या उपक्रमाला ग्रामस्थांकडून दुर्दैवाने विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या प्रकल्पासाठी गायरानची जागा देण्याचा गावसभेत एकमुखी ठराव करण्यात आला. ग्रामस्थांनी गावच्या हिताच्या काही मागण्याही यावेळी केल्या होत्या. या मागण्या मान्य करवून घेऊनच हा प्रकल्प उभारण्यास सुरुवात करण्यात यावी, असे सुचविले होते. गावकऱ्यांच्या या मागण्यांचे पुढे काय झाले? हे सांगण्याअगोदरच केवळ दोनच दिवसांत मक्तेदार कंपनीकडून अत्यंत घाईगडबडीने जागा ताब्यात घेऊन वनीकरणातील वृक्षतोड केली आहे.

सौर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने एक वर्षापूर्वी पाच हेक्टर जमीन देण्याचा ठराव दिला होता. मात्र प्रत्यक्षात १० हेक्टर जागा संपादित केली आहे. गावच्या हिताच्या अन्य काही मागण्याही जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कंपनीला कळविल्या आहेत. याबाबत त्यांच्याकडून अद्याप काहीही उत्तर मिळालेलं नाही; त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत. - अभिषेक पाटील, उपसरपंच

टॅग्स :kolhapurकोल्हापूर