शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमातून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण व्हावे : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारत असताना आपल्या अभ्यासक्रमातून निरंतर कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांनी ...

कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारत असताना आपल्या अभ्यासक्रमातून निरंतर कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी दर्जेदार कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आजच्या काळाची गरज आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास या शिक्षणाचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थ्यांना होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. शिर्के बोलत होते. यावेळी डॉ. नंदकुमार मेकोथ, विभागाचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, हरिष बोहरा, प्राचार्य व्ही. ए. माने उपस्थित होते. वेबिनारला देशभरातून ३४६ शिक्षक, संशोधक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षण क्षेत्रावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची जबाबदारी वाढली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये प्रत्येक विदयार्थी हा गुणवत्तापूर्ण, उदरनिर्वाहक्षम बनविणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची अधिकाधिक रचना होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळत नाही. अशावेळी शाळा, महाविद्यालयांनी आपला विदयार्थी रोजगारक्षम बनविण्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे असून या कौशल्य प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान त्याला भावी जीवनात उपयुक्त ठरेल. आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उद्योजकता व रोजगार निर्मिती या बाबीसाठी असणारे महत्त्व सर्व शाळा, महाविद्यालयांनी अभ्यासून त्यानुसार सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे बीजभाषण करताना गोवा व्यवस्थापन संस्थेचे प्रा. डॉ. नंदकुमार मेकोथ म्हणाले, आज केवळ कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, याबाबत चर्चा होताना आपण पाहतो. परंतु कौशल्य विकासाकडे विद्यार्थ्यांनी अतंत्य सूक्ष्मपणे पाहून आपले जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी विविध कौशल्ये परिपूर्णतेने आत्मसात करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात डॉ. बी. एम. हिर्डेकर व डॉ. अनिल राव यांनीही विचार मांडले.

विभागाचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य व्ही. ए. माने यांनी स्वागत केले. यावेळी शुभांगी जरंडीकर, डॉ. सुमन बुवा, महेश चव्हाण, यशोधन बोकील, अतुल एतवाडेकर व आयोजन समितीचे सर्व घटक उपस्थित होते.