शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

Kolhapur: ‘बाल संगोपन’मधील सहा हजारांवर बालके नियमित अनुदानापासून वंचित

By भीमगोंड देसाई | Updated: September 11, 2024 13:18 IST

एकल मुलांच्या पालकांची हेळसांड : सहा हजार बालके उपाशी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन संगोपन योजनेतील लाभासाठी आतापर्यंत ८ हजार १६२ मुला, मुलींच्या पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. यातील पात्र ठरलेल्या सहा हजार बालकांचे पालकही नियमित अनुदानापासून वंचित आहेत. दोन हजार १६२ अर्जदार मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. याचे पालक तालुका ते जिल्हा कार्यालयातील संबंधीत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत आहेत. शासनाचे काम आणि सहा महिने थांब असा अनुभव येत आहे. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणीला दर महिने १५०० रूपये जमा करणारे शासन मात्र परिस्थितीमुळे अनाथपण आलेल्या बालकांना मात्र दर महिने २२५० रूपये निर्वाह भत्ता देण्यासाठी टाळटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे.अर्ज केल्यानंतर जिल्हयाच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन पडताळणी करून घ्यावी लागते. योजनेतील अर्जदारांची गृहचौकशी होते. विविध टप्यातील प्रक्रियेसाठी प्रचंड विलंब होत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरल्यानंतर नियमितपणे लाभाची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे १४०० पेक्षा अधिक पात्र मुलांना जुलै २०२३ पासून अनुदान जमा झालेले नाही. उर्वरित मुलांचे मार्च मार्च २०२४ पासून अनुदान मिळालेले नाही. 

मोबाईल उचलत नाही, कार्यालयात भेटत नाहीत..महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हयाचे कार्यालय मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये आहे. तेथील प्रमुख अधिकारी सुहास वाईंगडे कार्यालयात भेटत नाहीत आणि मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रिसीव्ह करीत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. असे बेभरोशाचे अधिकारी महिला, बालकाचे काय कल्याण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लाभ कोणाला मिळू शकतो ?

  • शून्य ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, पालकांचा पत्ता लागत नाहीत असे किंवा दत्तक देणे शक्य नसलेले बालक.
  • एक पालक असलेले बालके.
  • कुटुंबातील न्यायालयीन वाद, तंटे, वादविवादामुळे बाधीत झालेले बालके.
  • कुष्ठरोग, जन्मठेपची शिक्षा भोगत असलेले वडीलांची, एचआयव्ही किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या पालकांची मुले.
  • दोन्ही पालक दिव्यांग असलेल्यांची मुले.

शासनाकडून अनुदान आल्यानंतर लाभार्थींच्या खात्यावर जमा केले जाते. निधी मिळण्यात अनियमितता असल्याने संगोपनाचे अनुदान देता आले नाही. लोकांना भेटण्यासाठी मी नेहमी कार्यालयात असतो. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतो. -सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर