शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग : हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:25 PM

गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

ठळक मुद्दे हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांना दिलासा;  वनविभागाचा वरिष्ठस्तरावर प्रस्ताव 

सिंधुदुर्ग : गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

या पकडलेल्या हत्तींना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात सोडून त्या ठिकाणच्या बंदिस्त जागेत त्यांना माणसाळविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वनविभागाने वरिष्ठ स्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिलारीतील हत्ती उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि पर्यायाने कोकणला हत्ती हा प्राणी दुर्मीळच! मात्र सन २००२ मध्ये कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सिंधुुदुर्गात हत्तींचे कुतूहल कमी झाले. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे प्रथम हत्तींनी प्रवेश केला आणि तेथूनच हत्तींचा प्रवास सुरू झाला.

भातशेती, केळी, पोफळी, माड बागायतींचे दर दिवशी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करीत या हत्तींनी थेट जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ओरोस गाठले आणि हत्ती उपद्रवाची झळ संपूर्ण जिल्ह्याला बसली.त्यानंतर पर्यटकांनाही हे हत्ती पाहण्यासाठी उपलब्ध होतील. हा एलिफंट कॅम्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरेल, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून, मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.पकडलेल्या हत्तींना माणसाळविण्यासाठी आजराच का? तेथील जमीन निश्चित करण्यामागचे कारण काय? याबाबत पुराणिक यांना विचारले असता त्यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली. हत्तींना थंड वातावरण, सपाट-विस्तीर्ण जागा आवश्यक असते, जी आजऱ्यात उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी तिलारीचा परिसर नैसर्गिक अधिवास होऊ शकत नाही.

तिलारीतील वातावरण उष्ण आहे. शिवाय जमीनही सपाट नाही. त्यामुळे हत्तींना माणसाळविण्यासाठी आजऱ्याचा परिसर आणि वातावरण पोषक आहे. शिवाय हत्तींचा लोकांनाही कोणताही त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.मंत्र्यांकडून पाठपुरावापालकमंत्री दीपक केसरकर हत्ती प्रश्नाबाबत संवेदनशील आहेत. त्यांनाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी वनविभागाची योजना चांगली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. लवकर हत्तींना पकडून माणसाळविण्यात येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग