शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधार नोंदणी ९८.४२ टक्के पूर्ण

By admin | Updated: May 30, 2017 18:13 IST

आधार नोंदणी केंद्रावरच करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. ३0 : जिल्ह्यात आधार नोंदणीचे काम मे अखेरील ९८.४२ टक्के झाले असून उर्वरीत नोंदणी व आधार मधील बदल अशा सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूर्व परवानगीने सुरु असलेल्या आधार नोंदणी केंद्रावरुनच करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सध्या आधार नोंदणी संकेतस्थळाच्या अद्यवतीकरणाचे काम सुरु असून केंद्र सरकार कडून वेळोवेळी आज्ञावलीमध्ये बदल करण्यात येत आहेत. आधार नोंदणी करतेवेळी आधार मशीन सोबत जीपीएस उपकरण लावणे बंधनकारक असल्याने आधार नोंदणी कोणत्या भागातून झाली आहे याची नोंद मिळण्यास मदत होत आहे. आधार केंद्रावरुन वापरली जाणारी आज्ञावली ही आधार संस्थेने विकसित केलेली असून देशातील सर्व आधार केंद्रावरही एकच आज्ञावली वापरली जात आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रचालकांना आधार कायदा २0१६ बद्दल मार्गदर्शन करण्यात आलेले असून आधार नोंदणीतील चुकांच्या कामगिरीबाबत दंडाची आकारणी देखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आधार नोंदणीचे काम पुर्वी एनपीएसटी या संस्थेकडून होत होते. या संस्थेकडून जिल्ह्यात आधार नोंदणी किटचे असमान वाटप झाल्याने जिल्ह्यातील काही भागातील लोकांना बऱ्याच दुरवरचे अंतर कापावे लागत होते. असे ब-याच आधार केंद्रचालकांना तत्कालीन एनपीएसटी कंपनीकडून कोणतेच सहयोग मिळत नव्हते. ती व्यक्ती जिल्ह्याबाहेर राहत होती व जिल्ह्यातील केंद्रचालकांना दूरध्वनीवरुन देखील उध्दट उत्तरे मिळत होती.  

जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन जिल्ह्यातील आधार नोंदणीचे काम थेट सी. एस. सी. कंपनीकडे दिले. जिल्ह्यातील प्रत्येक जि. प. गणामागे एक केंद्रचालक अशी जिल्हा परिषदेच्या गणाची जबाबदारी दिली आहे. हे केंद्रचालक स्वत:चे केंद्रातून तसेच वेळोवेळी ज्या त्या जि. प. गणातील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांशी व तलाठ्यांशी संपर्क साधून गरज भासल्यास ज्या त्या ग्रामपंचायतमध्ये कॅम्प लावणार आहेत. अशा पध्दतीने जिल्ह्यातील प्रत्येक जि. प. मतदार संघनिहाय वाटप झाल्याने व जिल्ह्यातील आधरच्या कामामध्ये केंद्रचालकांना तांत्रिक मदत होत असल्याने सर्वस्तरावरुन समाधान व्यक्त केले जात आहे. नागरीकांनी आधारकार्ड नोंदणी करतेवेळी ओळखीचा व पत्याचा पुरावा म्हणून नमूद केलेली मूळ कागदपत्रे सोबत असणे बंधनकारक आहे.

ओळखीचा पुरावा- जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, रहिवासी दाखला फोटो लावून (ग्रामसेवक), शाळेचे ओळखपत्र/ बोनाफाईड, रेशनकार्ड (फोटो असलेले), ड्रायव्हिंग लायसन्स, पेन्शनर फोटो कार्ड, मतदान कार्ड. पत्याचा पुरावा- बँक पासबुक, जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला फोटो लावून (ग्रामसेवक), पोस्ट आॅफीस पासबुक, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईटबिल ३ महिने. तसेच प्राप्त झालेल्या आधार कार्डमध्ये नावात बदल करावयाचे असल्यास जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, राजपत्र (गॅझेट) प्रत, प्रतिज्ञापत्र नावात बदल केल्याचे (विवाहानंतरचे), विवाह दाखला (फोटो आवश्यक), पॅनकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड (फोटो असलेले), शाळेचे ओळखपत्र/ बोनाफाईड, पत्यात बदल करायचे असल्यास बँक पासबूक, रहिवासी दाखला फोटो लावून (सरपंच/ नगराध्यक्ष), जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रेशनकार्ड. जन्मतारीख बदल करायचे असल्यास जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला (माध्यमिक).

कोष्टकानुसार ज्या त्या कामासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या यादीतील कोणतेही कागदपत्रांची मूळप्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. हे कागदपत्र स्कॅन करुन आपणास परत करण्यात येतील. आधार केंद्रचालकांनी आधार नोंदणी केल्यानंतर आधार क्रमांक प्राप्त न झाल्यास सर्व प्रथम आधीच्या नोंदणीची पावतीनुसार तपासून पहावे खात्री झाल्यानंतरच पुर्ननोंदणी करावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.