शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधार नोंदणी ९८.४२ टक्के पूर्ण

By admin | Updated: May 30, 2017 18:13 IST

आधार नोंदणी केंद्रावरच करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. ३0 : जिल्ह्यात आधार नोंदणीचे काम मे अखेरील ९८.४२ टक्के झाले असून उर्वरीत नोंदणी व आधार मधील बदल अशा सर्व नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूर्व परवानगीने सुरु असलेल्या आधार नोंदणी केंद्रावरुनच करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सध्या आधार नोंदणी संकेतस्थळाच्या अद्यवतीकरणाचे काम सुरु असून केंद्र सरकार कडून वेळोवेळी आज्ञावलीमध्ये बदल करण्यात येत आहेत. आधार नोंदणी करतेवेळी आधार मशीन सोबत जीपीएस उपकरण लावणे बंधनकारक असल्याने आधार नोंदणी कोणत्या भागातून झाली आहे याची नोंद मिळण्यास मदत होत आहे. आधार केंद्रावरुन वापरली जाणारी आज्ञावली ही आधार संस्थेने विकसित केलेली असून देशातील सर्व आधार केंद्रावरही एकच आज्ञावली वापरली जात आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रचालकांना आधार कायदा २0१६ बद्दल मार्गदर्शन करण्यात आलेले असून आधार नोंदणीतील चुकांच्या कामगिरीबाबत दंडाची आकारणी देखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आधार नोंदणीचे काम पुर्वी एनपीएसटी या संस्थेकडून होत होते. या संस्थेकडून जिल्ह्यात आधार नोंदणी किटचे असमान वाटप झाल्याने जिल्ह्यातील काही भागातील लोकांना बऱ्याच दुरवरचे अंतर कापावे लागत होते. असे ब-याच आधार केंद्रचालकांना तत्कालीन एनपीएसटी कंपनीकडून कोणतेच सहयोग मिळत नव्हते. ती व्यक्ती जिल्ह्याबाहेर राहत होती व जिल्ह्यातील केंद्रचालकांना दूरध्वनीवरुन देखील उध्दट उत्तरे मिळत होती.  

जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन जिल्ह्यातील आधार नोंदणीचे काम थेट सी. एस. सी. कंपनीकडे दिले. जिल्ह्यातील प्रत्येक जि. प. गणामागे एक केंद्रचालक अशी जिल्हा परिषदेच्या गणाची जबाबदारी दिली आहे. हे केंद्रचालक स्वत:चे केंद्रातून तसेच वेळोवेळी ज्या त्या जि. प. गणातील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांशी व तलाठ्यांशी संपर्क साधून गरज भासल्यास ज्या त्या ग्रामपंचायतमध्ये कॅम्प लावणार आहेत. अशा पध्दतीने जिल्ह्यातील प्रत्येक जि. प. मतदार संघनिहाय वाटप झाल्याने व जिल्ह्यातील आधरच्या कामामध्ये केंद्रचालकांना तांत्रिक मदत होत असल्याने सर्वस्तरावरुन समाधान व्यक्त केले जात आहे. नागरीकांनी आधारकार्ड नोंदणी करतेवेळी ओळखीचा व पत्याचा पुरावा म्हणून नमूद केलेली मूळ कागदपत्रे सोबत असणे बंधनकारक आहे.

ओळखीचा पुरावा- जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, रहिवासी दाखला फोटो लावून (ग्रामसेवक), शाळेचे ओळखपत्र/ बोनाफाईड, रेशनकार्ड (फोटो असलेले), ड्रायव्हिंग लायसन्स, पेन्शनर फोटो कार्ड, मतदान कार्ड. पत्याचा पुरावा- बँक पासबुक, जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला फोटो लावून (ग्रामसेवक), पोस्ट आॅफीस पासबुक, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईटबिल ३ महिने. तसेच प्राप्त झालेल्या आधार कार्डमध्ये नावात बदल करावयाचे असल्यास जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, राजपत्र (गॅझेट) प्रत, प्रतिज्ञापत्र नावात बदल केल्याचे (विवाहानंतरचे), विवाह दाखला (फोटो आवश्यक), पॅनकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड (फोटो असलेले), शाळेचे ओळखपत्र/ बोनाफाईड, पत्यात बदल करायचे असल्यास बँक पासबूक, रहिवासी दाखला फोटो लावून (सरपंच/ नगराध्यक्ष), जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रेशनकार्ड. जन्मतारीख बदल करायचे असल्यास जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला (माध्यमिक).

कोष्टकानुसार ज्या त्या कामासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या यादीतील कोणतेही कागदपत्रांची मूळप्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. हे कागदपत्र स्कॅन करुन आपणास परत करण्यात येतील. आधार केंद्रचालकांनी आधार नोंदणी केल्यानंतर आधार क्रमांक प्राप्त न झाल्यास सर्व प्रथम आधीच्या नोंदणीची पावतीनुसार तपासून पहावे खात्री झाल्यानंतरच पुर्ननोंदणी करावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.