शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

विशाळगड, उदगिरी, आंबा, अणुस्कुरा घाटात गुन्हेगारी जोरात : पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:35 IST

विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण

ठळक मुद्देपर्यटनस्थळे गुन्हेगारीचे माहेरघर-- शाहूवाडीत गुन्हेगारीचे हॉटस्पॉट

- आर. एस. लाड ।आंबा : कोल्हापूरच्या सीमेवरील विशाळगड, उदगिरी, आंबा व अणुस्कुरा घाट हा निसर्गरम्य व ऐतिहासिक ठिकाणे निर्जन व दुर्गमतेमुळे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनत आहेत. शुक्रवारी विशाळगड मार्गावरील कोकण पॉर्इंटवर इंचलकरंजीच्या तरुणांनी वर्चस्वाच्या ईर्षेतून संतोष तडाखेला येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी आणूून रस्त्यापासून केवळ वीस फुटांवर गळा चिरून दरीत फेकले. दीड वर्षापूर्वी मानोली धरणावरील झाडीत रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर सडलेल्या मृतदेहाचा पंचनामा करावा लागला. चार वर्षांपूर्वी पावनखिंडीत भीक मागणाऱ्या एका धनगराच्या वृद्धेला मारून टाकले होते. निर्जनता, दुर्गमता व पोलीस बंदोबस्ताचा अभाव यामुळे गुन्हा करून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी ही दुर्गम ठिकाणे सोईची होत असल्याने या भागात गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. त्याची दहशत स्थानिकांची डोकेदुखी बनत आहेच, शिवाय येथील निसर्ग पर्यटनाला छेद देणारी ठरत आहे.

विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अवैध व्यावसायांनी गडावर पुन्हा डोके वर काढले. उदगिरी व धोपेश्वर ही देवस्थानेही जंगलातील आहेत. जुगाई येथील पावणाई मंदिर उदगिरीतील काळाम्बाई येथेही कोंबड्याचा बळी देणारी, लिंबू जपणारी देवदेवस्कीची अंधश्रद्धा जपली जाते. त्यातून गुन्हेगारी घटनांना बळ मिळते. गेल्या दोन वर्षांत ग्रामीण भागात चोरीचे प्रमाणही वाढले आहे.

घातपात की अपघातगेळवडे जलाशयाचे बॅक वॉटरचे पात्र केंबुर्णेवाडी ते गजापूर असे चार किलोमीटर रस्त्यालगत विस्तारले आहे. विशाळगडावर येणारा भाविक या जलाशयावर अंघोळ, कपडे व वाहन धुणे, भोजनासाठी येथे विसावतो; पण जलाशयाचा अंदाज नसल्याने अंघोळीस जाणाऱ्यांना जलसमाधी मिळालेल्या घटना दरवर्षी येथे घडतात. बाराजणांना येथे जलसमाधी मिळाल्यानंतही येथे बंदी घालण्याचे प्रशासनाला सूचलेले नाही. प्रथमदर्शनी अपघात कधी कधी घातपात तर नसावा, असा प्रश्न येथे पडतो. आपत्कालीन व्यवस्थेची या भागात मोठी गरज आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी