शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

विशाळगड, उदगिरी, आंबा, अणुस्कुरा घाटात गुन्हेगारी जोरात : पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:35 IST

विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण

ठळक मुद्देपर्यटनस्थळे गुन्हेगारीचे माहेरघर-- शाहूवाडीत गुन्हेगारीचे हॉटस्पॉट

- आर. एस. लाड ।आंबा : कोल्हापूरच्या सीमेवरील विशाळगड, उदगिरी, आंबा व अणुस्कुरा घाट हा निसर्गरम्य व ऐतिहासिक ठिकाणे निर्जन व दुर्गमतेमुळे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनत आहेत. शुक्रवारी विशाळगड मार्गावरील कोकण पॉर्इंटवर इंचलकरंजीच्या तरुणांनी वर्चस्वाच्या ईर्षेतून संतोष तडाखेला येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी आणूून रस्त्यापासून केवळ वीस फुटांवर गळा चिरून दरीत फेकले. दीड वर्षापूर्वी मानोली धरणावरील झाडीत रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर सडलेल्या मृतदेहाचा पंचनामा करावा लागला. चार वर्षांपूर्वी पावनखिंडीत भीक मागणाऱ्या एका धनगराच्या वृद्धेला मारून टाकले होते. निर्जनता, दुर्गमता व पोलीस बंदोबस्ताचा अभाव यामुळे गुन्हा करून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी ही दुर्गम ठिकाणे सोईची होत असल्याने या भागात गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. त्याची दहशत स्थानिकांची डोकेदुखी बनत आहेच, शिवाय येथील निसर्ग पर्यटनाला छेद देणारी ठरत आहे.

विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अवैध व्यावसायांनी गडावर पुन्हा डोके वर काढले. उदगिरी व धोपेश्वर ही देवस्थानेही जंगलातील आहेत. जुगाई येथील पावणाई मंदिर उदगिरीतील काळाम्बाई येथेही कोंबड्याचा बळी देणारी, लिंबू जपणारी देवदेवस्कीची अंधश्रद्धा जपली जाते. त्यातून गुन्हेगारी घटनांना बळ मिळते. गेल्या दोन वर्षांत ग्रामीण भागात चोरीचे प्रमाणही वाढले आहे.

घातपात की अपघातगेळवडे जलाशयाचे बॅक वॉटरचे पात्र केंबुर्णेवाडी ते गजापूर असे चार किलोमीटर रस्त्यालगत विस्तारले आहे. विशाळगडावर येणारा भाविक या जलाशयावर अंघोळ, कपडे व वाहन धुणे, भोजनासाठी येथे विसावतो; पण जलाशयाचा अंदाज नसल्याने अंघोळीस जाणाऱ्यांना जलसमाधी मिळालेल्या घटना दरवर्षी येथे घडतात. बाराजणांना येथे जलसमाधी मिळाल्यानंतही येथे बंदी घालण्याचे प्रशासनाला सूचलेले नाही. प्रथमदर्शनी अपघात कधी कधी घातपात तर नसावा, असा प्रश्न येथे पडतो. आपत्कालीन व्यवस्थेची या भागात मोठी गरज आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी