शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वनविभागाला ही माहिती नसावी का?लॉकडाऊनच्या काळात लाकूडतोड्यांनी साधली मोठी संधी... तक्रार देऊनही अजून प्रशासन करतंय दूर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:16 IST

शेतबांधावरील जवळपास ४५० झाडांची तोड होऊन १० ट्रक लाकूड धामोड येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातुन जात असताना वनविभागाला याची जराही चाहूल लागली नाही यामागचा ' अर्थ ' काय ? अशी विचारणा तक्रारदार शेतकऱ्याकडून होत आहे .

ठळक मुद्देबेले- धामोड दरम्यानच्या शिवेवर प्रचंड वृक्षतोड* वनपाल व वनरक्षकांकडून कारवाई ऐवजी मिटवा मिटवीला प्राधान्य

धामोड - (ता.राधानगरी ) --धामोड व बेले (ता.राधानगरी ) येथील डोंगरावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैद्य वृक्षतोड झाली आहे . महिनाभरापूर्वी ही वृक्षतोड झाली असताना व तक्रारदार शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई पर्यंतच्या वनविभागाच्या कार्यालय प्रमुखांना तक्रारी दिल्या असताना देखील म्हासूर्ली वनपाल व वनरक्षक सदर प्रकरणावर कारवाई करण्याची ऐवजी तक्रारदार शेतकऱ्याला उपदेशाचे डोस देऊन सदर प्रकरणात तडजोड करण्याची भाषा वापरत आहेत . शेतबांधावरील जवळपास ४५० झाडांची तोड होऊन १० ट्रक लाकूड धामोड येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातुन जात असताना वनविभागाला याची जराही चाहूल लागली नाही यामागचा ' अर्थ ' काय ? अशी विचारणा तक्रारदार शेतकऱ्याकडून होत आहे .

लॉकडाउनच्या संधीचा फायदा घेत राशिवडे खुर्द बेले व धामोडदरम्यानच्या डोंगरमाथ्यावरील शेतीच्या बांधावरील साडेचारशे झाडांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे .सचिन पाटील व त्याचे चुलत भाऊ अशा चौघांच्या हिस्स्यातील आठरा एकराच्या शेतीच्या बांधावर वडिलोपार्जित आंबा, साग,सिसम,खैर ,फणस अशा मौल्यवान वृक्षांची लागवड करण्यास आली होती. पण लॉकडाउनचा फायदा घेत दिनकर रामचंद्र पाटील,शंकर रामचंद्र पाटील,वेताळ विठ्ठल पाटील यांनी परस्पर सामुदायिक शेतीमधील साडेचारशे झाडे सचिन व नरेश पाटील यांना विचारात न घेता अवघ्या दोन दिवसात तोडली. धामोड येथील ठेकेदाराने कटरच्या साहाय्याने या झाडांची कत्तल करून सुमारे ८ते दहा लाखाचे दहा ट्रक लाकूड धामोड मार्गे चोरून विक्रीस पाठवले.

पाच हिस्सेदारांच्या शेतीच्या बांधावरील ही झाडे तोडण्यासाठी कोणताही प्रकारचा परवाना घेतलेला नाही. वन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी वेताळ पाटील यांनी वन विभागाला हाताशी धरूनच या झाडांची कत्तल केली आहे . याासंबंधीची तक्रार वन विभागाच्या राधानगरी कार्यालयात नोंदवली आहे.पण या तक्रारीची साधी दखल सुध्दा घेतली नसल्याचे सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.राधानगरी वन विभागावाडे तक्रार देऊन महिना उलटला तरी कोणतीच कारवाई होत नसल्याने आपण मुख्यमंत्री कार्यालय तसेच मुंबई व नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंद केली आहे. झाडे तोडणीची परवानगी न नसताना किंवा ठेकेदाराचा परवाना देखील नसताना लाखो रुपयाच्या झाडांची कत्तल वन विभागाचे ऑफास असणाऱ्या गावात होत असताना वनरक्षक व वनपाल नेमके कोणाचे रक्षण करण्यात गुंतलेले आहेत? दहा ट्रक लाकडाची वाहतूक वन विभागाच्या कार्यालयाच्या दारातून होत असताना वन विभागाचे अधिकारी नेमके काय करत होते .असा प्रश्न सचिन व नरेश पाटील बंधूंनी विचारला असून याची पाळेमुळे शोधून आम्हा गरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रारी द्वारे केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल