शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

वनविभागाला ही माहिती नसावी का?लॉकडाऊनच्या काळात लाकूडतोड्यांनी साधली मोठी संधी... तक्रार देऊनही अजून प्रशासन करतंय दूर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:16 IST

शेतबांधावरील जवळपास ४५० झाडांची तोड होऊन १० ट्रक लाकूड धामोड येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातुन जात असताना वनविभागाला याची जराही चाहूल लागली नाही यामागचा ' अर्थ ' काय ? अशी विचारणा तक्रारदार शेतकऱ्याकडून होत आहे .

ठळक मुद्देबेले- धामोड दरम्यानच्या शिवेवर प्रचंड वृक्षतोड* वनपाल व वनरक्षकांकडून कारवाई ऐवजी मिटवा मिटवीला प्राधान्य

धामोड - (ता.राधानगरी ) --धामोड व बेले (ता.राधानगरी ) येथील डोंगरावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैद्य वृक्षतोड झाली आहे . महिनाभरापूर्वी ही वृक्षतोड झाली असताना व तक्रारदार शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई पर्यंतच्या वनविभागाच्या कार्यालय प्रमुखांना तक्रारी दिल्या असताना देखील म्हासूर्ली वनपाल व वनरक्षक सदर प्रकरणावर कारवाई करण्याची ऐवजी तक्रारदार शेतकऱ्याला उपदेशाचे डोस देऊन सदर प्रकरणात तडजोड करण्याची भाषा वापरत आहेत . शेतबांधावरील जवळपास ४५० झाडांची तोड होऊन १० ट्रक लाकूड धामोड येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातुन जात असताना वनविभागाला याची जराही चाहूल लागली नाही यामागचा ' अर्थ ' काय ? अशी विचारणा तक्रारदार शेतकऱ्याकडून होत आहे .

लॉकडाउनच्या संधीचा फायदा घेत राशिवडे खुर्द बेले व धामोडदरम्यानच्या डोंगरमाथ्यावरील शेतीच्या बांधावरील साडेचारशे झाडांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे .सचिन पाटील व त्याचे चुलत भाऊ अशा चौघांच्या हिस्स्यातील आठरा एकराच्या शेतीच्या बांधावर वडिलोपार्जित आंबा, साग,सिसम,खैर ,फणस अशा मौल्यवान वृक्षांची लागवड करण्यास आली होती. पण लॉकडाउनचा फायदा घेत दिनकर रामचंद्र पाटील,शंकर रामचंद्र पाटील,वेताळ विठ्ठल पाटील यांनी परस्पर सामुदायिक शेतीमधील साडेचारशे झाडे सचिन व नरेश पाटील यांना विचारात न घेता अवघ्या दोन दिवसात तोडली. धामोड येथील ठेकेदाराने कटरच्या साहाय्याने या झाडांची कत्तल करून सुमारे ८ते दहा लाखाचे दहा ट्रक लाकूड धामोड मार्गे चोरून विक्रीस पाठवले.

पाच हिस्सेदारांच्या शेतीच्या बांधावरील ही झाडे तोडण्यासाठी कोणताही प्रकारचा परवाना घेतलेला नाही. वन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी वेताळ पाटील यांनी वन विभागाला हाताशी धरूनच या झाडांची कत्तल केली आहे . याासंबंधीची तक्रार वन विभागाच्या राधानगरी कार्यालयात नोंदवली आहे.पण या तक्रारीची साधी दखल सुध्दा घेतली नसल्याचे सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.राधानगरी वन विभागावाडे तक्रार देऊन महिना उलटला तरी कोणतीच कारवाई होत नसल्याने आपण मुख्यमंत्री कार्यालय तसेच मुंबई व नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंद केली आहे. झाडे तोडणीची परवानगी न नसताना किंवा ठेकेदाराचा परवाना देखील नसताना लाखो रुपयाच्या झाडांची कत्तल वन विभागाचे ऑफास असणाऱ्या गावात होत असताना वनरक्षक व वनपाल नेमके कोणाचे रक्षण करण्यात गुंतलेले आहेत? दहा ट्रक लाकडाची वाहतूक वन विभागाच्या कार्यालयाच्या दारातून होत असताना वन विभागाचे अधिकारी नेमके काय करत होते .असा प्रश्न सचिन व नरेश पाटील बंधूंनी विचारला असून याची पाळेमुळे शोधून आम्हा गरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रारी द्वारे केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल