शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात रेबिज लसीचा तुटवडा, सहा महिन्यांत भटक्या कुत्र्यांचा ४५ हजार जणांना चावा

By समीर देशपांडे | Updated: July 31, 2025 18:59 IST

सांगलीहून मागवली लस

समीर देशपांडेकोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असताना आणि सहा महिन्यांत तब्बल ४५ हजार ९७२ जणांना चावा घेतला असताना, दुसरीकडे रेबिजची लस मात्र मिळेना, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सर्वच जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असून, कंपन्यांकडूनच पुरवठ्यावर मर्यादा आल्याचे सांगण्यात येते.कोल्हापूर जिल्ह्यात २०२४ मध्ये ८६ हजार ८५८ जणांना कुत्र्यासह अन्य प्राण्यांनी चावा घेतला होता. हेच प्रमाण १ जानेवारी ते ३० जून २०२५ पर्यंत ४५ हजार ९७२ इतके आहे. यातील जवळपास ९६ टक्के व्यक्तींना कुत्र्याने चावले आहे. तर, उर्वरित चार टक्क्यांमध्ये अन्य प्राणी येतात. ज्या सगळ्यांनाच कुत्रे चावले आहे, त्या सर्वांनाच रेबिजची लस द्यावीच लागते असे नाही. परंतु, चावा घेतल्यानंतर रक्तस्त्राव झाला असेल किंवा मोठी जखम झाली असेल, तर मात्र रेबिज प्रतिबंधक लस घ्यावी लागते.जिल्ह्यातील चावा घेतलेल्या आणि ज्यांना रेबिज प्रतिबंधक लसीची गरज आहे, अशी संख्या विचारात घेता जिल्ह्यासाठी दरमहा सुमारे २५०० डोसची गरज आहे, परंतु सध्या केवळ १५०० डोस जिल्ह्यात उपलब्ध आहेत. एका रुग्णाला चार डोस द्यावे लागत असल्याने प्रत्यक्षात हे ३०० च डोस उपलब्ध असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांच्या ठिकाणी या लसीचा तुटवडा जाणवत आहे.

सांगलीहून मागवली लसजिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर रेबिज प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने सध्या सांगली जिल्ह्यातून हा साठा मागवण्यात आला आहे. तेथील शासकीय रुग्णालयातून ही लस मागवण्यात आली असून, कोल्हापूर जिल्ह्याला लस उपलब्ध झाल्यानंतर सांगलीला पुन्हा त्यांचे डोस परत देण्यात येणार आहेत.

३० हजार डोस खरेदीची फाईल अंतिम टप्प्यातरेबिज प्रतिबंधक लसीचे ३० हजार डोस खरेदी करण्यासाठीची फाइल अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया होऊन हे डाेस खरेदी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

वटवाघूळही चावतेचावा घेतलेल्या व्यक्तींपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ९६ टक्के व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला आहे. तर मांजर, घुशी, उंदीर, कोल्हा, लांडगा, माकड आणि वटवाघळाने चावल्याच्याही घटना घडल्या आहेत.

एकूण ३५ जणांचा मृत्यूगेल्या ११ वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात श्वानदंशाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये दोघे अन्य राज्यांतील, दोघे अन्य जिल्ह्यांतील आणि उर्वरित जिल्ह्यातील आहेत.

गेल्या सहा महिन्यांतील श्वानदंश

  • जानेवारी - ८,२३०
  • फेब्रुवारी - ७,४५३
  • मार्च - ८,१११
  • एप्रिल - ७,२८०
  • मे - ७,९७५
  • जून - ६,९२३

युद्धपातळीवर लस मिळवण्याची गरजएकीकडे कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहेत आणि दुसरीकडे लस मिळेना, अशी स्थिती आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून लस उपलब्ध करून देण्यासाठी सूचना देण्याची गरज आहे.