शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बहुजन मुक्ती मोर्चाच्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:55 IST

सीएए, एनआरसीविरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळाला. निवडक कार्यकर्त्यांनी दसरा चौक ते बिंदू चौक पदयात्रा काढून एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व सिद्ध करावे, अशी मागणी घोषणेद्वारे केली गेली.

ठळक मुद्देबहुजन मुक्ती मोर्चाच्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व सिद्ध करा

कोल्हापूर : सीएए, एनआरसीविरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळाला. निवडक कार्यकर्त्यांनी दसरा चौक ते बिंदू चौक पदयात्रा काढून एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व सिद्ध करावे, अशी मागणी घोषणेद्वारे केली गेली.बहुजन मुक्ती मोर्चा व बामसेफतर्फे वामन मेश्राम यांच्या आवाहनानुसार बुधवारी देशभर बंद पुकारण्यात आला होता. कोल्हापुरातही बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंद असल्यामुळे कोल्हापुरात सकाळपासून व्यापारी, दुकानदार दुकाने उघडायची की नाहीत या संभ्रमात होते. अंदाज येत नसल्याने प्रत्येकाने दुकानाचे शटर अर्धेच बंद केले होते.अकराच्या सुमारास बहुजन मुक्ती मोर्चाचे संयोजक महेश बावडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र जमले. शाहू महाराजांना अभिवादन करून तिथे एनआरसीविरोधात घोषणा दिल्यानंतर ते बिंदू चौकाकडे मार्गस्थ झाले.

येथे प्रमोद हर्षवर्धन, समीर मुजावर, महेश बावडेकर, हिदायत मणेर, मौलाना बशीर यांनी मनोगत मांडले. यात एनआरसीला कडाडून विरोध करताना डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व ठरवावे, अशी मागणी केली. तशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या. दरम्यान, मोर्चा संपल्यानंतर १२ वाजल्यापासून कोल्हापुरातील सर्वच दुकाने, व्यवहार पूर्ववत झाले. दिवसभर कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.मोर्चात गौरव मनोरकर, मौलाना असिफ, मौलाना अझर, मौलाना समीर, मोहन सरदार, कुलदीप जोगडे, चंद्रकांत नागावकर यांनीही सहभाग घेतला. 

 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदkolhapurकोल्हापूर