शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:12 IST

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे.

ठळक मुद्दे धान्य, किराणा दुकानांसह अन्य व्यापार बंद व्यापारी-व्यावसायिकांचा उद्यापासून जनता कर्फ्यू

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या कालावधीत कृषी, बी-बियाणे आणि साहित्य विक्री, औषध दुकाने, दूधविक्रीची दुकाने आणि शहर, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू राहणार आहेत. किराणा-भुसारी, धान्यासह अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहतील.या कर्फ्यूचा निर्णय कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी (दि. ८) जाहीर केला. त्यातील निर्णयानुसार शहरातील कृषी, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहतील. धान्य, मसाला, खाद्यतेल, किराणा-भुसारी, प्लायवूड, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी., ऑटोमोबाईल, आदींशी संबंधित अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. गुजरी येथील सराफ व्यावसायिकांची दुकानेही बंद राहतील.

या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांना आवश्यक असणारे धान्य, आदी साहित्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत खरेदी करावे. व्यापारी, व्यावसायिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असल्याने बँका सुरू ठेवण्याची मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.नागरिकांनी साथ द्यावीआपला आणि इतरांचा जीव वाचला, तर व्यवसाय-व्यापार चालणार आहे. ते लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूचे पालन करावे. नागरिक, ग्राहक सुरक्षित राहावेत या उद्देशाने आम्ही सहा दिवसांचा कर्फ्यू पाळणार आहोत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. घरातून बाहेर पडू नये. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी या कर्फ्यूचे कडकपणे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले.राजारामपुरीतील दुकाने राहणार सुरूया जनता कर्फ्यूमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापारी आणि कामगार वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. जनता कर्फ्यू करूनही काही व्यवसाय, उद्योग चालू, तर काही व्यवसाय बंद राहतील. अशा प्रकारे उपाययोजना करून कोरोना आटोक्यात येईल, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जनता कर्फ्यूपेक्षा ही व्यक्तिगत काळजी, जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाय, सॅनिटाईजिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर अधिक आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची काळजी घेऊन राजारामपुरी परिसरातील व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी आणि सचिव रणजित पारेख यांनी दिली. दरम्यान, राजारामपुरी परिसरात विविध लहान-मोठी १२०० दुकाने आहेत. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर