शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:12 IST

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे.

ठळक मुद्दे धान्य, किराणा दुकानांसह अन्य व्यापार बंद व्यापारी-व्यावसायिकांचा उद्यापासून जनता कर्फ्यू

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या कालावधीत कृषी, बी-बियाणे आणि साहित्य विक्री, औषध दुकाने, दूधविक्रीची दुकाने आणि शहर, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू राहणार आहेत. किराणा-भुसारी, धान्यासह अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहतील.या कर्फ्यूचा निर्णय कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी (दि. ८) जाहीर केला. त्यातील निर्णयानुसार शहरातील कृषी, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहतील. धान्य, मसाला, खाद्यतेल, किराणा-भुसारी, प्लायवूड, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी., ऑटोमोबाईल, आदींशी संबंधित अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. गुजरी येथील सराफ व्यावसायिकांची दुकानेही बंद राहतील.

या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांना आवश्यक असणारे धान्य, आदी साहित्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत खरेदी करावे. व्यापारी, व्यावसायिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असल्याने बँका सुरू ठेवण्याची मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.नागरिकांनी साथ द्यावीआपला आणि इतरांचा जीव वाचला, तर व्यवसाय-व्यापार चालणार आहे. ते लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूचे पालन करावे. नागरिक, ग्राहक सुरक्षित राहावेत या उद्देशाने आम्ही सहा दिवसांचा कर्फ्यू पाळणार आहोत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. घरातून बाहेर पडू नये. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी या कर्फ्यूचे कडकपणे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले.राजारामपुरीतील दुकाने राहणार सुरूया जनता कर्फ्यूमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापारी आणि कामगार वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. जनता कर्फ्यू करूनही काही व्यवसाय, उद्योग चालू, तर काही व्यवसाय बंद राहतील. अशा प्रकारे उपाययोजना करून कोरोना आटोक्यात येईल, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जनता कर्फ्यूपेक्षा ही व्यक्तिगत काळजी, जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाय, सॅनिटाईजिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर अधिक आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची काळजी घेऊन राजारामपुरी परिसरातील व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी आणि सचिव रणजित पारेख यांनी दिली. दरम्यान, राजारामपुरी परिसरात विविध लहान-मोठी १२०० दुकाने आहेत. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर