शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:12 IST

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे.

ठळक मुद्दे धान्य, किराणा दुकानांसह अन्य व्यापार बंद व्यापारी-व्यावसायिकांचा उद्यापासून जनता कर्फ्यू

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या कालावधीत कृषी, बी-बियाणे आणि साहित्य विक्री, औषध दुकाने, दूधविक्रीची दुकाने आणि शहर, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू राहणार आहेत. किराणा-भुसारी, धान्यासह अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहतील.या कर्फ्यूचा निर्णय कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत व्यापारी, व्यावसायिकांनी मंगळवारी (दि. ८) जाहीर केला. त्यातील निर्णयानुसार शहरातील कृषी, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहतील. धान्य, मसाला, खाद्यतेल, किराणा-भुसारी, प्लायवूड, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी., ऑटोमोबाईल, आदींशी संबंधित अन्य व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. गुजरी येथील सराफ व्यावसायिकांची दुकानेही बंद राहतील.

या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांना आवश्यक असणारे धान्य, आदी साहित्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत खरेदी करावे. व्यापारी, व्यावसायिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असल्याने बँका सुरू ठेवण्याची मागणी आम्ही महानगरपालिकेकडे केली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.नागरिकांनी साथ द्यावीआपला आणि इतरांचा जीव वाचला, तर व्यवसाय-व्यापार चालणार आहे. ते लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी या जनता कर्फ्यूचे पालन करावे. नागरिक, ग्राहक सुरक्षित राहावेत या उद्देशाने आम्ही सहा दिवसांचा कर्फ्यू पाळणार आहोत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. घरातून बाहेर पडू नये. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी या कर्फ्यूचे कडकपणे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले.राजारामपुरीतील दुकाने राहणार सुरूया जनता कर्फ्यूमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापारी आणि कामगार वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. जनता कर्फ्यू करूनही काही व्यवसाय, उद्योग चालू, तर काही व्यवसाय बंद राहतील. अशा प्रकारे उपाययोजना करून कोरोना आटोक्यात येईल, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जनता कर्फ्यूपेक्षा ही व्यक्तिगत काळजी, जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाय, सॅनिटाईजिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर अधिक आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची काळजी घेऊन राजारामपुरी परिसरातील व्यापार, व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी आणि सचिव रणजित पारेख यांनी दिली. दरम्यान, राजारामपुरी परिसरात विविध लहान-मोठी १२०० दुकाने आहेत. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर