शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने तेवढी बंद, रस्त्यावर मात्र वर्दळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:47 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पहिला दिवस या नियमाचे केवळ फार्सच ठरला. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती, तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत होते. रस्त्यावर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी असं म्हणण्याची वेळ आली.

ठळक मुद्देदुकाने तेवढी बंद, रस्त्यावर मात्र वर्दळचशहरातील चित्र : कुठे आहे संचारबंदी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पहिला दिवस या नियमाचे केवळ फार्सच ठरला. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती, तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत होते. रस्त्यावर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी असं म्हणण्याची वेळ आली.राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी बुधवारी (दि. १४ एप्रिल) रात्री आठ ते १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी जाहीर करताना नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन करण्यात आले होेते; पण त्याउलट परिस्थिती गुरुवारी सकाळपासून कोल्हापूर शहरात होती. वाट्टेल ती कारणे देत नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनांमधून फिरत होते. सकाळपासूनच शहरातील उपनगरांपासून ते मध्यवर्ती परिसर, भाजी मंडई, बाजारपेठांमध्ये लोक खरेदीसाठी येत होते. सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत शहरातील संचारबंदीची स्थिती पाहण्यासाठी फेरफटका मारताना जणू शहराला संचारबंदीतून सूट दिली आहे की काय, अशी शंका आली.ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कारण विचारले जात होते. लायसन्सची मागणी केली जात होती. योग्य कारण व लायसन्स नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात होती. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजारामपुरीचा बाह्य परिसर, उपनगरांमध्येही सगळीकड़े अशीच वर्दळ होती.प्रत्येकाकडे दवाखान्याची फाईलदुपारी बारा वाजता बिंदू चौकात पोलीस, ट्रॅफिक पोलीस व कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी येथून जाणाऱ्या नागरिकांना अडवून फिरण्याचे कारण विचारत होते. त्यातील ७० टक्के लोकांनी दवाखान्याचे कारण पुढे केले. पुरावा दाखवा म्हटले की प्रत्येकाच्या डिकीत दवाखान्याची फाईल, औषधांची जुनी चिठ्ठी आहेच. शिवाजी पेठेतल्या महिलेला बिंदू चौकातल्या बेकरीतून पदार्थ घ्यायचे आहेत. कुणाला ट्रेझरीत जायचं आहे, तर कुणाला बँकेत, एकाच्या घरातला किराणा माल संपला आहे, कुणाला भाजी घ्यायची आहे, दुसऱ्याला व्यवसायाच्या साहित्यांची वाहतूक करायची आहे, अशी एक अनेक कारणे देत लोक फिरत होते. या कारणांना संचारबंदीतून सुट दिल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही अशी अडचण पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी मांडली.महाद्वार कडकडीत बंदशहरात एकीकडे मोठी वर्दळ असताना मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोडवर मात्र शुकशुकाट होता. दुकाने शंभर टक्के बंद होती. काही भाजी विक्रेते तेवढे रस्त्याकडेला बसले होते. राजारामपुरीतही शांतता होती. त्या उलट स्थिती लक्ष्मीपुरीत होती. इथे व्यावसायिकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होती.९ ते ११ ची वेळ द्यावीसंचारबंदी होणार हे माहीत असल्याने लोकांनी बुधवारपर्यंत किराणा मालासह अत्यावश्यक सेवेतील वस्तूंचा साठा करून ठेवला होता. तरी दुकाने दिवसभर सुरू आहेत, म्हणून खरेदीला बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने या अत्यावश्यक सेवेतील खरेदीसाठी रोज सकाळी नऊ ते अकरा अशी वेळ ठरवून द्यावी व त्यानंतर पूर्ण व्यवहार बंद ठेवावेत, अन्यथा या संचारबंदीला काही अर्थ राहणार नाही, अशी प्रतिक्रिया यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी व सुजाण नागरिकांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर