शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Kolhapur- शिवनाकवाडी विषबाधा प्रकरण: अन्न प्रशासनाच्या अहवालाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:57 IST

महाप्रसादातील खिरीचे व गावाला पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेतले

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील अन्न विषबाधा परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित बहुतेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. मात्र, ग्रामस्थ आणि आरोग्य विभागाला अन्न व प्रशासनाने घेतलेल्या अन्नाच्या नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.गावच्या कल्याणताई देवीच्या यात्रेत अन्नातून सुमारे ७०० हून अधिक जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. चार दिवस ४०० हून अधिक आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत होऊन आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला पत्र देऊन साथीचे आजार पसरू नयेत यासाठी गावातील स्वच्छता, तुंबलेल्या गटारी प्रवाहित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतही स्वच्छता मोहीम राबवत आहे. मात्र, विषबाधा कशातून झाली याचा अहवाल अन्न व प्रशासन विभागाकडून अद्याप आला नसल्याने या अहवालाची प्रतीक्षा सर्वांना करावी लागत आहे. दरम्यान, विषबाधा घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादातील खिरीचे व गावाला पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेतले आहे. महाप्रसादामध्ये खिरीबरोबरच अंबील, भात, आमटी याचाही समावेश होता. मात्र, केवळ खिरीचेच नमुने घेतल्याने व विषबाधा कदाचित इतर पदार्थांतून झाले असल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विषबाधा घटनेनंतर गावातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. ग्रामपंचायतीला गावातील स्वच्छता करण्यासाठी पत्र दिले आहे. दक्षता म्हणून गावातील उपकेंद्र २४ तास सेवेसाठी उपलब्ध असून तीन शिफ्टमध्ये १५ कर्मचारी व दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहेत. - डॉ. पांडुरंग खटावकर, शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधा