शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

शिवकुमार स्वामी.. देशातील दुसऱ्या ‘नालंदा’चे मठाधिपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:50 IST

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यात कधीकाळी बिहारच्या नालंदा विद्यापीठाने जगाला भुरळ घातली होती. काळाच्या ओघात नालंदा विद्यापीठाचे वैभव लोप पावलं... मात्र, बंगलोरपासून ७० किलोमीटर दूर तुमकूरच्या सिद्धगंगा मठात नालंदा विद्यापीठाच्या वैभवाची साक्ष देणाºया सामाजिक कार्याने अख्ख्या देशाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देदक्षिणेच्या सामाजिक, शैक्षणिक पटलावर गेली सात दशके आपली वेगळी छाप पाडत सामाजिक सुधारणा घडवून आणणाºया डॉ. शिवकुमार स्वामींना विनम्र अभिवादन...

- पोपट पवारशिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यात कधीकाळी बिहारच्या नालंदा विद्यापीठाने जगाला भुरळ घातली होती. काळाच्या ओघात नालंदा विद्यापीठाचे वैभव लोप पावलं... मात्र, बंगलोरपासून ७० किलोमीटर दूर तुमकूरच्या सिद्धगंगा मठात नालंदा विद्यापीठाच्या वैभवाची साक्ष देणाºया सामाजिक कार्याने अख्ख्या देशाचे लक्ष वेधले. अर्थात या मठाचे मठाधीश डॉ. शिवकुमार स्वामी यांच्या आधुनिक विचारसरणीनेच हा मठ सर्वच क्षेत्रांत देशाच्या केंद्रस्थानी आला.

कर्नाटकच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक पटलावर डॉ. शिवकुमार स्वामी यांचा प्रभाव हा इतर कोणत्याही धर्मगुरूंच्या तुलनेत कितीतरी मोठा होता. ते ज्या मठाचे मठाधिपती होते, त्या सिद्धगंगा मठाचा इतिहास ७०० वर्षांचा आहे. लिंगायत सांप्रदायाचा सर्वांत मोठा मठ म्हणून तुमकूर येथील सिद्धगंगा मठाची ख्याती आहे. लिंगायत समाजाच्या मठातूनच सत्तेच्या सारीपाटावरील यशापयश ठरविलं जातं. या मठाचे मठाधीश डॉ. शिवकुमार स्वामी यांचा आशीर्वादच समाजाची राजकीय, सामाजिक दिशा ठरवीत असते.

शिवकुमार स्वामी यांच्या निधनाने कर्नाटकाच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एक तारा निखळला. कन्नड जनतेने देवत्व बहाल केलेला त्यांचा देवही हरपला आहे. १ एप्रिल १९०७ रोजी म्हैसूरजवळील वीरापुरा येथे जन्मलेले स्वामी कर्नाटकातील एक प्रमुख समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी फक्त लिंगायत समाजाच्याच नव्हे, तर राज्यातील इतर समाजांच्या कल्याणासाठीदेखील विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले होते. सिद्धगंगा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून १२५हून अधिक शाळा चालवीत या मठाने कर्नाटकच्या कानाकोपºयांत ज्ञानाचा प्रसार केला आहे.

लिंगायत समाजाचा मठ म्हणून सिद्धगंगा मठ ओळखला जात असला तरी कोणत्याही जातीच्या मुलांना या मठाचे दरवाजे बंद नसतात. शिवकुमार स्वामी यांच्या संकल्पनेतूनच मठाच्या माध्यमातून तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच जेवण, राहण्याची सोय करीत शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतही मोठं योगदान दिले आहे. असं म्हणतात की, या मठाची चूल कधीच बंद होत नाही. रोज २० हजार लोकांना अन्नदान करून या मठाने नवा आदर्श घालून दिला आहे. प्राचीन भाषेचे संवर्धन करतानाच पाश्चिमात्य भाषाही अवगत व्हावी यासाठी स्वामींंनी आपल्या शैक्षणिक संस्थामध्ये या दोन्ही भाषांचा अभ्यासक्रम सुरूकेला आहे. विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीचा इतिहास सांगणारी देशभरातील सर्वच भाषांमधील पुस्तके सिद्धगंगा मठाने जतन केली आहेत. त्यामुळे देशाच्या प्राचीन संस्कृतीचा ठेवा जपणारं सिद्धगंगा मठ हे आजघडीला देशातील एकमेव केंद्र असावं.

तब्बल १११ वर्षे जीवन जगलेल्या शिवकुमार स्वामी यांच्या आरोग्याचे रहस्यही नेहमीच चर्चेत राहिले. पहाटे अडीच वाजता आपला दिनक्रम सुरूकरणारे स्वामी अगदी शेवटच्या काळातही मठाच्या कारभारात लक्ष घालत होते, हे विशेष. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत २००७ मध्ये कर्नाटक सरकारने त्यांना ‘कर्नाटकरत्न’, तर २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले होते. उच्चशिक्षित असलेल्या शिवकुमार स्वामी यांनी देशभरातील अनेक राजकीय नेत्यांना आपल्या प्रभावाने सिद्धगंगा मठाकडे आकर्षित केले होते.

गत लोकसभा निवडणुकीच्या नमनालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवकुमार स्वामी यांची भेट घेतली होती. अमित शहा आणि राहुल गांधी यांनीही कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी सिद्धगंगा मठाची माती भाळी लावत कर्नाटकच्या सत्तेसाठी स्वामींकडे आशीर्वाद मागितला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून ते डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेकजण डॉ. स्वामी यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. दक्षिणेच्या सामाजिक, शैक्षणिक पटलावर गेली सात दशके आपली वेगळी छाप पाडत सामाजिक सुधारणा घडवून आणणाºया डॉ. शिवकुमार स्वामींना विनम्र अभिवादन...

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक