शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाचे पाण्याबाबत स्वयंपूर्णतेचे पाऊल!

By admin | Updated: May 13, 2016 00:54 IST

आठ एकरांत चार शेततळी साकारणार : तलाव, विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू

संतोष मिठारी -- कोल्हापूर -दुष्काळाची स्थिती लक्षात घेता, भविष्यात पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने पाऊल टाकले आहे. यासाठी विद्यापीठाच्या परिसरातील आठ एकर जागेत चार शेततळी साकारण्यासह दोन तलाव आणि आठ विहिरींच्या स्रोतांच्या पुनरुज्जीवनाचे काम राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि विद्यापीठाच्या प्रशासनाने सुरू केले आहे. शेततळ्यांद्वारे वर्षाला सुमारे दीड कोटी लिटर पाणीसाठा करण्याचे नियोजन केले आहे.विद्यापीठ हे मुख्य इमारतीवरील रेनवॉटर हार्वेस्टिंग तसेच परिसरातील दोन तलाव आणि सुस्थितीत असलेल्या सहा विहिरींमध्ये पावसाळ्यात पाणी संकलित करते. त्याचा दरवर्षी जून ते फेब्रुवारीपर्यंत वापर करते. विद्यापीठाला रोज सहा लाख लिटर पाणी लागते. मार्च ते मे महिन्यापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेकडून ते रोज चार लाख ६० हजार लिटर पाणी विकत घेते. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने विद्यापीठातील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण घटले. त्यामुळे विद्यापीठाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन पाण्याबाबत वर्षभर स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार प्रशासनाने केला. त्यानुसार विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग ते अभियांत्रिकी शेड परिसरातील आठ एकर जागेमध्ये चार शेततळी साकारण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू केले आहे. ‘एनएसएस’चे स्वयंसेवक, शारीरिक शिक्षण संचालक, विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांच्या श्रमदान, मदतीतून या शेततळ्यांचे काम सुरू आहे. सध्या एका शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासह वि. स. खांडेकर भाषाभवन आणि संगीत व नाट्यशास्त्र विभागाजवळील तलाव तसेच अन्य परिसरांतील आठ विहिरींचे नैसर्गिक स्रोत खुले करण्यासह गाळ काढण्याचे काम केले जात आहे. या स्रोतांच्या माध्यमातून विद्यापीठ पाण्याबाबत स्वयंपूर्ण होणार आहे.उपलब्ध पाण्याचे सुनियोजनविद्यापीठाच्या ८५३ एकर परिसरात विविध ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. त्याचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, आठ एकर परिसरात चार शेततळी साखळी पद्धतीने साकारण्यात येत आहेत. कमीत कमी एक ते जास्तीत जास्त पाच एकरांमध्ये शेततळे साकारण्यात येणार आहे. याद्वारे थेट जमिनीमध्ये पाणी मुरविले जाईल. शिवाय संकलित झालेले पाणी विहिरी, तलावांत वळविण्यात येईल. महानगरपालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या पाण्यासाठी विद्यापीठाला दरमहा साडेपाच लाख रुपये खर्च येतो. तो वाचविला जाणार आहे. त्यासह पाणीबचतीसाठी विद्यापीठातील विविध विभागांमध्ये स्वयंचलित बंदकळ (अ‍ॅटो स्टॉप) बसविले जाणार आहेत. परिसरात कुठेही कूपनलिका मारल्या जाणार नाहीत. त्यासह जलसाक्षरतेचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.पाणी हे जीवन आहे; त्यामुळे त्याचा प्रत्येकाने गरजेनुसारच वापर करावा, त्याचा अपव्यय करू नये. सध्याची दुष्काळाची स्थिती लक्षात घेता, पिण्यासाठी ग्लास भरून पाणी घेण्याऐवजी तांब्या आणि फुलपात्राचा वापर करावा. पाणीबचतीसाठी तरुणाईने अधिकतर पुढाकार घ्यावा. त्यांनी स्वत: ते आचरणात आणून इतरांना पाणीबचतीचे महत्त्व पटवून द्यावे. त्या दृष्टीने विविध उपक्रम राबवावेत. दुष्काळ आहे म्हणून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, यापुढेही दुष्काळाची परिस्थिती येऊ नये या दृष्टीने प्रत्येकाने पाण्याचे नियोजन करावे. घरे, कार्यालयांच्या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात यावे. पाण्याचा एक-एक थेंब वाचवावा. ‘लोकमत’तर्फे विविध स्वरूपांतील सामाजिक बांधीलकी जोपासणारे उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत ‘लोकमत’ने सध्या हाती घेतलेला ‘जलमित्र अभियान’ हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजातील विविध घटकांपर्यंत जलसाक्षरता पोहोचणार आहे.- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शिवाजी विद्यापीठ