शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

शिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:47 IST

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून धरली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठकअहवाल तीन महिन्यात, कुलसचिवांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून धरली. याबाबत समिती नेमून तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत अभाविपने कुलगुरु आणि प्रकुलगुरुंना मार्च महिन्यात प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली, पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारले, याबाबत विद्यार्थी परिषदेने लेखी आश्वासन मिळावे या मागणीसाठी सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंदोलन केले.कार्यकर्त्यांनी बैठकीसमोरील जागेत जवळपास दोन तास ठिय्या मारुन या बैठकीत घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरु आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना निवेदन देउन लेखी आश्वासन देण्याचा आग्रह धरला. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती.

या बैठकीत कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परिक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. महेश काकडे, प्रकुलगुरु डॉ. शिर्के यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी कुलगुरुंच्या आदेशान्वये व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल, समितीच्या बैठका त्वरित आयोजित करुन तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री साधना वैराळे, जिल्हा संयोजन श्रीनिवास सूर्यवंशी, ओंकार मगदूम (इचलकरंजी) तसेच गणेश जाधव, दिपांजली पिसे (सांगली) यांनी केले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर