शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
2
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
3
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
4
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
5
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
6
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
8
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
9
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
10
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा
11
ऑफिसला या नाहीतर, कंपनीही सोडू शकता; गुगलचा 'वर्क फ्रॉम होम'बद्दल कठोर निर्णय
12
रेल्वे रुळावर बाईक पेटवली, रीलच्या नादात जीवघेणी स्टंटबाजी तरुणाला महागात पडली!
13
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय; आता हवे तेवढे टेरिफ लावू शकतात...
14
Sonam Raghuvanshi : "सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा
15
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी
16
BLOG: ‘बुलेट’ येईलच हो, पण आधी लोकल ‘ट्रॅक’वर आणा! इतके जीव जातात, तरी काहीच कसं वाटत नाही?
17
'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण
18
WTC Final : रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर चर्चेत आला बुमराह; जाणून घ्या त्यामागचं कारण
19
रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम
20
सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

शिवाजी विद्यापीठाच्या निधीवर बोजा; हंगामी शिक्षकांच्या पगारावर ३३ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:44 IST

रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने गेल्या पाच वर्षामध्ये हंगामी (११ महिन्यांसाठी) तत्वावरील एकूण ११८ शिक्षकांच्या पगारावर ३३ कोटी ६० लाख रुपये इतका खर्च केला आहे. रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे.

विविध अधिविभागांसाठी शासनाकडून शिक्षकांची २५२ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १५३ पदे पूर्णवेळ कार्यरत असून उर्वरित ९९ रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन विद्यापीठाच्या संशोधन वाढीस खीळ बसत आहे. अनुदानित विभागांतील रिक्त पदांवर विद्यापीठाने २८ आणि स्वयंअर्थसाहाय्यित विभागातील रिक्त पदांवर ९० शिक्षकांची हंगामी भरती केली आहे. त्यांना दरमहा ३२ हजार रुपये पगार दिला जातो.त्यातील अनुदानित विभागातील हंगामी शिक्षकांच्या पगारावर वर्षाला एक कोटी रुपये, तर स्वयंअर्थसाहाय्यित विभागांतील शिक्षकांवर साडेपाच कोटी रुपये खर्च होत आहेत. प्रत्येक अनुदानित आणि हंगामी शिक्षक विद्यापीठामध्ये कार्यरत असूनही सुमारे १०० शिक्षकपदांचा कार्यभार शिल्लक आहे. या पदांचा कार्यभार शासनाच्या सीएचबी धोरणानुसार विद्यापीठाने दोनशेहून अधिक शिक्षकांची नेमणूक करावी. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक, आर्थिक भार कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल.

शिक्षकांच्या पदांची आकडेवारी

अनुदानित विभाग : ३५

शासनमान्य पदे : २५२

पूर्णवेळ कार्यरत : १२५

रिक्त : १२७

हंगामी : २८

स्वयंअर्थसाहाय्यित विभाग : २१

पूर्णवेळ कार्यरत : २८

रिक्त : १२०

हंगामी : ९०

हंगामी भरती का?

विद्यापीठातील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदाच्या भरतीला शासनाची मान्यता मिळत नाही. अधिविभागातून शिक्षण देण्याची गरज असल्याने विद्यापीठ हंगामी तत्त्वावर शिक्षकांची भरती विद्यापीठ प्रशासनाकडून केली जाते.

अनुदानित शिक्षकांचा शिल्लक कार्यभार शासनमान्य सीएचबी धोरणानुसार भरून विद्यापीठ फंडावरील आर्थिक बोजा कमी होण्यास निश्चित हातभार लागेल. विद्यापीठाचे बचत झालेले पैसे संशोधन, नवोपक्रम, आदींसाठी वापरावेत. - डॉ. एस. डी. डेळेकर

मुंबई, औरंगाबाद, आदी विद्यापीठांमध्ये सीएचबी धोरणानुसार शिक्षकांच्या जागा भरून वेळेचा आणि पैशांचा सदुपयोग केला जातो. त्या पद्धतीचा उपयोग शिवाजी विद्यापीठाने करणे गरजेचे आहे. विद्यापीठाला नवसंशोधन करताना निधीची कमतरता भासते. भविष्यात जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करायची असेल तर विद्यापीठाला अनावश्यक खर्चाची बचत करावी लागेल. - प्रा. मधुकर पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठTeacherशिक्षक