शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाकडून ३४ हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:38 IST

आॅक्टोबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिलेल्या एकूण ३४ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रलंबित निकाल जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाकडून ३४ हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीरआॅक्टोबर, मार्च परीक्षा; नियमित, पुनर्परीक्षार्थींचा समावेश

कोल्हापूर : आॅक्टोबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिलेल्या एकूण ३४ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रलंबित निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात नियमित आणि पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. संबंधित निकाल शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला असल्याची माहिती, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी  दिली.प्रलंबित असलेले निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे बुधवारी (दि. १२) विद्यापीठात बैठक घेऊन केली होती. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी निकाल रविवार (दि. १६)पर्यंत जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. प्रलंबित निकालाबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक काकडे यांनी सांगितले की, विद्यापीठातील परीक्षाविषयक कामकाजातून जुलै २०१७ मध्ये ‘एमकेसीएल’ प्रणाली बाहेर पडली.

या प्रणालीतून ६२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ३९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २३ हजार विद्यार्थ्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये पुनर्परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिली. या दरम्यान ‘एमकेसीएल’च्या प्रणालीतून मिळालेल्या माहितीचे विद्यापीठाच्या प्रणालीमध्ये हस्तांतरण झाले नसल्याने या पुनर्परीक्षार्थींचा निकाल पूर्णपणे जाहीर करण्यात आला नव्हता.

आॅक्टोबर २०१७ मधील २३ हजार विद्यार्थ्यांपैकी १२ हजार विद्यार्थी मार्च २०१८ मध्ये पुनर्परीक्षार्थी झाले. माहितीचे हस्तांतरण झाल्याने विद्यापीठाने आॅक्टोबरमधील २३ हजार आणि मार्चमधील ११ हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे.

उर्वरित निकालांबाबत प्रक्रिया सुरूज्या परीक्षार्थींबाबतच्या माहिती उपलब्धतेमध्ये त्रुटी आहेत, अशा सुमारे १००० विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. ते लवकरात लवकर जाहीर करण्याबाबत परीक्षा मंडळाकडून प्रक्रिया सुरू असल्याचे काकडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर